महावितरण कर्मचाऱ्यांची आशादीप संस्थेला मदत

रत्नागिरी : ग्राहकांना अखंड वीजपुरवठा करण्यासाठी सतत धडपडणाऱ्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी सातत्याने प्रयत्नपूर्वक जपली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरीतील आशादीप या विशेष मुलांच्या कार्यशाळेला लोखंडी कपाट भेट देण्यात आले.

कोकणात पावणेदोन वीजग्राहकांकडे ७४ लाखाची थकबाकी, अधिकारी हवालदिल

रत्नागिरी : सातत्याने वीजबिल भरण्याचे आवाहन करूनही ग्राहकांनी महावितरण कंपनीला ठेंगा दाखविला आहे. कोकण मंडळातील दोन जिल्ह्यांत पावणेदोन लाखाहून अधिक ग्राहकांकडे ७३.५७ कोटीची लाखाची थकबाकी आहे. बिलांची थकबाकी कशी संपवायची, याच विचाराने अधिकारी हवालदिल झाले आहेत.

वाढत्या थकबाकीमुळे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कारवाईची भीती

रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत महावितरण कंपनीच्या बिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे कर्मचारी कारवाईच्या भीतीच्या छायेत वावरत आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील एकूण एक लाख ८१ हजार ९९४ ग्राहकांकडे ८३ कोटी चार लाखाची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू असून होळी, रविवार किंवा सणाची कोणतीच सुट्टी न घेता येत्या ३१ मार्चपर्यंत सर्व वीजबिल भरणा केंद्रावर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.