प्लास्टिकबाबत प्रशासनाची उदासीनता

रत्नागिरीसह सर्वत्र सर्वसामान्यांच्या नजरेला दिसणारा प्लास्टिकचा कचरा त्याच रस्त्यावरून भरधाव वेगाने धावणारे मंत्री, आमदार, त्यांच्या पाठीमागून फिरणारे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामपंचायतीपर्यंतच्या कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिसत नाही. त्याचे काही करावे, असे त्यांना वाटत नाही. प्रसारमाध्यमे आणि जाहीर कार्यक्रमात प्लास्टिकविरोधातील घोषणा दिल्या, की त्यांचे काम संपले!

background blank business craft

कौशल्य मिळेल, रोजगाराचे काय?

उद्योगांचे असे प्रशिक्षण मोठ्या प्रमाणावर दिले जात असले तरी त्या प्रमाणात रोजगार निर्माण होतात का, याचा विचार करायला हवा. प्रशिक्षण खूप ठिकाणी मिळते. आर्थिक स्तरानुसार ते मोफत किंवा आवश्यक ते शुल्क भरूनही दिले जाते. मोठ्या प्रमाणावर तरुण हे प्रशिक्षण घेत आहेत. पण असे प्रशिक्षित किती तरुण स्वतःचा उद्योग निर्माण करतात आणि उद्योजक होतात, हा प्रश्नच आहे.

dispenser with soap and corona word

सीएम केअर योजनेची गरज

माय राजापूर या संस्थेने राजापूर तालुक्यात या समस्येचा आढावा घेतला आणि शक्य असेल तेवढी मदत अशा कुटुंबांना केली. पण ती तात्पुरत्या स्वरूपाची आणि प्रासंगिक मदत होती. इतरही काही सामाजिक संस्थांनी तात्पुरत्या स्वरूपाची मदत केली. पण अशा संस्था दीर्घकाळ मदत करू शकत नाहीत. त्याची जबाबदारी शासनानेच घ्यायला हवी. तशा योजनेचा तातडीने अभ्यास करून राज्य शासनाने सीएम केअर योजना आखण्याची गरज आहे.

महर्षी कर्वे विधवा सन्मान चळवळ

शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी विधवांच्या सन्मानाचा विचार मांडूनही विधवांना समाजात चांगले स्थान मिळाले पाहिजे, हा महर्षी कर्वे यांचा विचार आजही अमलात येऊ शकला नाही, ही दुर्दैवी बाब आहे. आता काही गावांनी त्यासाठी पुढाकार घेतला ही बाब स्तुत्य आहे, पण या विचाराचे उद्गाते भारतरत्न कर्वे यांचे स्मरण त्यानिमित्ताने केले पाहिजे.

अग्रलेख वाचा पुढील लिंकवर….

शासकीय अनास्थेचा बळी ठरलेले हॉस्पिटल

साप्ताहिक कोकण मीडियाच्या १४ ऑगस्टच्या अंकाचे संपादकीय…

आमच्या परगण्यात आम्हीच शासन

दोन-दोन परगण्यांची जहागिरी सांभाळणे तसे काही सोपे नाही. आम्ही शासन आहोत हे पदोपदी सांगावे लागते, पण सांगण्यापेक्षा कृतीवर आमचा भर अधिक आहे. त्यामुळे राज्याचे सारे सैनिक आपापल्या ठिकाणी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आहेत का, याची पाहणी आम्हाला अधूनमधून करावी लागते. कधी आम्हाला बहिर्जी नाईक यांची आठवण होते, तर कधी शिवप्रभूंची. पण आठवणीत रममाण होण्यापेक्षा त्यांचे विचार कृतीत आणावेत म्हणून आम्ही पूर्ण प्रयत्न करतो.