मंडणगड : भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांचे आंबडवे हे जन्मगाव आत्मनिर्भरतेसाठी देशाला दिशा देणारे ठरावे आणि केंद्र सरकारने बाबासाहेबांच्या स्मृती जपणाऱ्या पंचतीर्थ योजनेमध्ये या गावाचाही समावेश करावा. महाराष्ट्राप्रमाणे ७ नोव्हेंबर हा शाळाप्रवेश दिवस देशभर साजरा केला जावा, अशी अपेक्षा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली.