रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महाराष्ट्र दिन ध्वजवंदन

रत्नागिरी : रत्नागिरीत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या हस्ते आज येथील पोलीस संचलन मैदानावर चौसष्टाव्या महाराष्ट्र दिनानिमित्ताने ध्वजवंदन झाले.

पत्रकारांना हाकलण्याचा उद्दामपणा

आपल्यावरील अन्यायाविरुद्ध पत्रकार रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची शक्यता नाही आणि त्यांनी तसे ते केले तरी ते केवळ प्रतीकात्मक असेल. नेत्यांप्रमाणे त्यांच्या पाठीशी लोकांचा जमाव नसतो. पण तरीही लोकमत जागवण्याचे, नवी मते निर्माण करण्याचे काम माध्यमेच करू शकतात. दडपशाही करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात लोकमत तयार करण्याचे कामही ही माध्यमे करू शकतात, याची जाणीव प्रशासनाने ठेवायला हवी. लोकप्रतिनिधी संभ्रम निर्माण करतात, माध्यमे समन्वय निर्माण करू शकतात. त्यांच्याशी प्रशासनाने समन्वयानेच वागायला हवे. त्यांना हाकलण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या मुळावर येऊ शकतो.

दिशा मिळाली, लक्ष्य कोठे?

शिंदे शिवसेनेचे रत्नागिरी जिल्ह्यातील नेते तर संपूर्ण जिल्हा शिवसेनामय करण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत. विविध व्यासपीठांवरून त्याचाच उल्लेख केला जात आहे. याचाच अर्थ भाजपाला एकही जागा देण्याची त्यांची मानसिकता नाही. खासदारपद शिवसेनेचेच आहे, असेही ठामपणे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या विजय संकल्प मेळाव्याचा कितपत उपयोग होईल, हा प्रश्न आहे.

हरहुन्नरी पत्रकाराचा अकाली अस्त

माध्यमांचे स्वरूप बदलले तरी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याचे पत्रकारितेचे काम संपलेले नाही. सोशल मीडियावर अशा घटनांना फारसे स्थान मिळत नाही, पण सोशल मीडियाचे काही घटक आपापल्या परीने सर्वसामान्यांचे प्रश्न मांडायचा प्रयत्न करत असतात. संदेश सप्रे हे त्यापैकी एक पत्रकार होते. त्यांच्या पश्चात जवळच्या कुटुंबीयांना सावरण्याचा विचार सामाजिक संस्था, पत्रकारांच्या संघटनांनी करायला हवा. पत्रकारांसाठी शासन राबवत असलेल्या योजना अत्यंत तुटपुंज्या आहेत. त्यांचा लाभ ग्रामीण पत्रकारांना होण्याची शक्यताच नसते. अशा स्थितीत संदेशसारख्या पत्रकारांसाठी एखादी वेगळी योजना राबवायला शासनालाही भाग पाडायला हवे.

महामार्गावरचे वनीकरण

आता महामार्गाच्या दुतर्फा आणि मधोमध कोकणाच्या वातावरणाला पूरक अशी झाडे लावली गेली पाहिजेत. तसे सुरुवातीपासूनच सांगितले गेले आहे. सातत्याने त्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या आहेत. उद्योजक आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हे वनीकरण करून घ्यायचे असेल, तर ते स्थानिक स्वरूपातच होणार हे नक्की. त्यासाठी कोणताही कंत्राटदार नेमला जाणार नाही. म्हणूनच स्थानिक जातीची झाडे निवडणे आणि त्यांची लागवड करणे तसेच त्यांची जोपासना करणे ही कोकणवासीयांचीच जबाबदारी आहे. अन्यथा हा महामार्ग कोकणातून जाणारा तरीही उजाड महामार्ग ठरणार आहे.

मानभावीपणाची मागणी

भ्रष्टाचार रोखण्याचे कायदे कडक करण्याची मागणी होत असताना लाच घेताना किंवा अन्य कोणत्याही गुन्ह्यात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पकडले गेले, तर त्यांचे नाव आणि छायाचित्र जाहीर करू नये. त्यांची ओळख लपवावी, अशी मागणी सरकारी कर्मचारी आणि अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ही मागणी खरेच आश्चर्यकारक आणि मानभावीपणाची, साळसूदपणाची आहे.