करोनाच्या पार्श्वभूमीवर भातशेती; सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना ध्वनिचर्चासत्रातून मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी : सध्या करोनाच्या संसर्गाचे संकट मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे; मात्र खरीप हंगाम जवळ येत असल्याने कोकणाच्या शेतीतील महत्त्वाचे पीक असलेल्या भाताच्या लागवडीची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे खरीप भात लागवडीचे नियोजन, तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर शेती करताना घायची काळजी याविषयी सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना नुकतेच ध्वनिचर्चासत्राद्वारे घरबसल्या मार्गदर्शन करण्यात आले.

दिवसभरात रत्नागिरीत २४ आणि सिंधुदुर्गात एका रुग्णाची वाढ; रत्नागिरीची रुग्णसंख्या १५६

रत्नागिरी : आज (२४ मे) सायंकाळी मिरजमधून प्राप्त झालेल्या २७ अहवालांपैकी सहा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या आता १५१वर पोहोचली आहे. आज (२४ मे) सकाळीच १३ रुग्णांची भर पडली होती. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांच्या संख्येत आज १९ रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आज एक नवा करोनाबाधित रुग्ण आढळला आहे.

रत्नागिरीत १३ नवे करोनाबाधित; एकूण संख्या १४५

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२४ मे) करोनाचे १३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता १४५वर पोहोचली आहे. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास जिल्हा माहिती कार्यालयाकडून ही माहिती मिळाली.

रत्नागिरीत सहा जण करोनामुक्त; सिंधुदुर्गात आठ नवे रुग्ण; रत्नागिरीत १५ दिवसांत स्वॅब टेस्टिंग लॅब होणार

रत्नागिरी : रत्नागिरीतील जिल्हा सामान्य रुग्णालयातून आज (२३ मे) सहा रुग्णांना उपचारांनंतर करोनामुक्त झाल्यावर घरी सोडण्यात आले. तसेच, आज मिरजमधून आलेले ११५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आज रुग्णांमध्ये नवी वाढ झालेली नाही. रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात करोनाच्या निदानासाठी स्वॅब टेस्टिंग लॅब येत्या १५ दिवसांत सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू असून, तिचा लाभ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही होईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत दिली. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२३ मे) आठ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे ११ नवे रुग्ण आणि करोनाचा चौथा बळी; रुग्णसंख्या १२४वर

रत्नागिरी : २१ मे रोजी रात्री उशिरा आलेल्या अहवालांतील ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी नऊ जण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आहेत; मात्र दोन रुग्ण तपासणी करून आपापल्या घरी गेले असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी रात्री उशिरा दिली. त्यांना लवकरात लवकर शोधण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

रत्नागिरीतील आणखी १६ रुग्णांना करोनामुक्त झाल्याने घरी सोडले!

रत्नागिरी : गेले काही दिवस सातत्याने रत्नागिरी जिल्ह्यातील करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज (१९ मे) एक दिलासादायक