रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला. त्यात मंडणगड आणि दापोली या दोन तालुक्यांचा समावेश आहे. घराची छपरे उडून जात असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाने गावातील अनेक कुटुंबांना आधार दिला.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला. त्यात मंडणगड आणि दापोली या दोन तालुक्यांचा समावेश आहे. घराची छपरे उडून जात असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाने गावातील अनेक कुटुंबांना आधार दिला.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी/अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळच्या किनाऱ्यावर ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने धडकलेले निसर्ग चक्रीवादळ अखेर मंदावले आहे. या वादळामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये मालमत्तेचे
तीन जून २०२० – भारतीय हवामान विभागाने सकाळी नऊ वाजता प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार निसर्ग चक्रीवादळाची स्थिती…
रत्नागिरी/मुंबई : भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचे अखेर चक्रीवादळात रूपांतर झाले असून, ते तीन जून रोजी दुपारी ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने अलिबागच्या जवळ किनाऱ्यावर धडकणार आहे. याबद्दलचा ‘ऑरेंज मेसेज’ (चक्रीवादळाची पूर्वसूचना/दक्षतेचा इशारा) हवामान विभागाने जाहीर केला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या उत्तर कोकणातील जिल्ह्यांसह दक्षिण गुजरातमधील जिल्ह्यांना या वादळाचा थेट फटका बसणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे वाहणार आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या जिल्ह्याच्या मंडणगड, दापोली, गुहागर या तीन तालुक्यांमधील चार हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले असून, खबरदारीचा उपाय म्हणून तीन जूनला सकाळी नऊ ते दुपारी १२ या वेळेत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
रत्नागिरी : अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा गेल्या काही तासांत अधिक तीव्र झाला आहे. येत्या बारा तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची दाट शक्यता असून, त्यापुढील १२ तासांत त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने आज (दोन जून) सकाळी नऊ वाजता जाहीर केला आहे.
रत्नागिरी : आज १ जून २०२० पासून येत्या ४ जूनपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर निसर्ग नावाचे चक्रीवादळ येत असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी प्रसिद्धीला दिले आहे.