चिपळूणच्या वाशिष्ठी नदीतील गाळ तीन टप्प्यांत काढण्याचा निर्णय

रत्नागिरी : चिपळूणमधील वाशिष्ठी नदीतील गाळ तीन टप्प्यांत काढण्याचा निर्णय आज मुंबईत झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला. मात्र बैठकीत सुचविण्यात आलेले उपाय आणि करण्यात आलेली निधीची तरतूद पुरेशी नाही, असे मत चिपळूण बचाव समितीतर्फे व्यक्त करण्यात आले.

वाशिष्ठी खाडीवरच्या मालदोलीमधील शंभर वर्षांपूर्वीच्या वैशिष्ट्यपूर्ण वारसा वास्तूत आता वृद्धांसाठी‘आनंदाश्रम!’

कोकणातल्या वाशिष्ठी खाडीच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर वसलेल्या मालदोली गावात १९२० च्या आसपास उभारण्यात आलेली आणि पर्यटनात शास्त्रीय वेगळेपणा जपणारी ‘रामचंद्र वासुदेव मराठे न्यास’ ही हेरिटेज वास्तू येत्या रविवारी (२४ ऑक्टोबर २०२१) वृद्धांचे ‘आनंदाश्रम’ बनून नव्याने सर्वांच्या समोर येत आहे. या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूबद्दल आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाबद्दल धीरज वाटेकर यांनी लिहिलेला लेख…

पूरग्रस्त व्यापाऱ्यांना जिल्हा बँकेचे अल्प दरात कर्ज की पाच टक्के दराने?

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त, व्यापारी, दुकानदार, छोटेमोठे उद्योजक आणि वाहनधारकांना अल्प दरात कर्जपुरवठा करणार असल्याचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.मंत्री उदय सामंत यांनी जिल्हा बँक पाच टक्के दराने कर्जपुरवठा करणार असल्याचे काल जाहीर केले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांना अल्प दरात कर्ज मिळणार की, पाच टक्के दराने, याचा खुलासा होऊ शकला नाही.

हाहाकाराची भीषण उंची गाठणारा चिपळूणचा महापूर

चिपळूण : चिपळूण शहराला वाशिष्ठी नदीच्या पुराचा वेढा दरवर्षीच पडत असल्याने चिपळूणला महापूर नवीन नाही. मात्र यावर्षीच्या २२ जुलैच्या महापुराने चिपळूणमध्ये हाहाकाराची नवी भीषण उंची गाठली.

चिपळूण, खेडमधील पूरग्रस्तांसाठी प्रशासनाचे मदत आणि बचावकार्य सुरू

रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे चिपळूण, खेडमधील पूरग्रस्तांसाठी प्रशासनाचे मदत आणि बचावकार्य सुरू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. प्रामुख्याने चिपळूण शहराच्या विविध भागांमध्ये पाच हजाराहून अधिक लोक अडकून पडले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्याला पाच दिवसांसाठी ऑरेंज अॅलर्ट जारी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून १३ जूनपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या ताज्या बातमीपत्रानुसार या सर्व कालावधीत रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.