रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वाधिक ऑलिव्ह रिडले कासवाची पिल्ले समुद्रात

रत्नागिरी : ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्यातून राज्यातील सर्वाधिक पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. राज्यातील ५६ समुद्रकिनाऱ्यांवरून १ लाख ८६ हजार ५९६ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक ५४ हजार २७७ पिल्लांचा समावेश आहे.

… आणि दीड महिन्यानंतर शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट; रत्नागिरीत उत्साहात पार पडला प्रवेशोत्सव

दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर आज (१५ जून) रत्नागिरीतील शाळा मुलांच्या किलबिलाटाने पुन्हा गजबजल्या. जिल्हा परिषद आणि सरकारी शाळांसह खासगी शाळांमध्येही शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला.

दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीचा झेंडा; अभिजित पड्याळ आणि प्रसाद देवस्थळींनी यशस्वीरीत्या पूर्ण केली स्पर्धा

रत्नागिरीचे अभिजित पड्याळ आणि प्रसाद देवस्थळी यांनी आज (१४ जून) झालेली अत्यंत खडतर अशी दक्षिण आफ्रिकेतली ९० किलोमीटरची कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह, कार्यक्षम होण्याकरिता कार्य करणार : अ‍ॅड. दीपक पटवर्धन

‘पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह आणि कार्यक्षम होण्याकरिता नियमांची काटेकोर अंमलबजावणी, संचालक मंडळाकडून डोळसपणे काम होणे आणि नेमक्या नोंदी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने अभ्यासपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून राज्यभर राबवण्याचा प्रयत्न केला जाईल,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे नवे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.

शिस्तबद्ध आणि स्वच्छ कारभारासाठी प्रसिद्ध असलेले ॲड. दीपक पटवर्धन राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष

राज्यातील सर्व पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी रत्नागिरीचे सुपुत्र आणि स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची आज (१२ जून) बिनविरोध निवड झाली.

लांज्यातील काजू फॅक्टरीतील चोरीप्रकरणी दोघांना अटक; ९.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

लांज्यातील झिमण्स कॅश्यू पॉइंट या काजू फॅक्टरीत झालेल्या चोरीचा गुन्हा रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस आणला असून, दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.