रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१३ जून) दिवसभरात १९ जणांना करोनामुक्त झाल्यावर घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २७९ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण ६९ टक्क्यांवर पोहोचले आहे. दरम्यान, सिंधुदुर्गात आज नवा करोनारुग्ण सापडला नसून, १२ जणांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले आहे.