रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (आठ जून) दिवसभरात सहा करोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत घरी सोडलेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १७३ झाली आहे. रत्नागिरीत आत्ता १७७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ जणांनी करोनावर यशस्वीपणे मात केली असून, १०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, रत्नागिरीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात विकसित करण्यात आलेल्या अद्ययावर विषाणू प्रयोगशाळेचे उद्घाटन उद्या (नऊ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन होणार आहे.