देवरुख-संगमेश्वरात २५ हजार गणेशमूर्तींचे शांततेत विसर्जन; गौरींनाही निरोप

देवरुख : करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव भाविकांनी अत्यंत साधेपणाने आणि नियम व अटींचे पालन करून साजरा केला. देवरुखात आज (२७ ऑगस्ट) पाच दिवसांच्या गणपतींना, तसेच गौरींनाही शांततेत निरोप देण्यात आला. देवरुख परिसरात १२ हजार व संगमेश्वर परिसरात १३ हजार घरगुती गणेशमूर्तींचे आज विसर्जन झाले.

ऋषीपंचमीची कंदमुळांची भाजी (व्हिडिओसह)

ऋषीपंचमीला कंदमुळाची भाजी केली जाते. पूर्वीच्या काळी जंगलात वास्तव्याला असलेल्या ऋषी-मुनींच्या आहारात प्रामुख्याने कंदमुळेच असत. ऋषीपंचमीला केल्या जाणाऱ्या भाजीमागची मूळ संकल्पना तीच आहे. ऋषीपंचमीच्या या भाजीत उपलब्धतेनुसार विविध कंदमूळवर्गीय भाज्या, रानातल्या पालेभाज्या, फळभाज्या आदींचा समावेश असतो. अशा वैविध्यपूर्ण भाज्यांमुळे कंदमुळाच्या या भाजीची चव आणि पौष्टिकता या दोन्ही गोष्टी अप्रतिम असतात.