दासबोधातील श्री गणेशस्तवन (श्लोक पहिला)

आज (१९ ऑगस्ट २०२०) भाद्रपद महिना सुरू झाला आहे. हा महिना गणेशोत्सवासाठी ओळखला जातो. समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात त्यांनी गणेशस्तवन केले आहे. त्यात ३० श्लोक आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने, त्यातील एकेक ओवी महिनाभर दररोज कोकण मीडियावर प्रसिद्ध केली जाणार आहे. सोबत त्याचा सोप्या भाषेतील अर्थही दिला जाईल. त्यातील पहिली ओवी आज (भाद्रपद शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी) प्रसिद्ध करत आहोत.

विशेष एसटी गाड्यांचा लाभ घेण्याचे महाराष्ट्र एसटीप्रेमी महासमूहाचे आवाहन; असे आहे वेळापत्रक

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि पुण्यातून जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीने विशेष गाड्या सोडल्या आहेत. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र एसटीप्रेमी महासमूहातर्फे करण्यात आले आहे.

चाकरमान्यांसाठी करोनाप्रतिबंधक सोयी दुप्पट करणार : जिल्हाधिकारी

रत्नागिरी : लवकरच सुरू होणार असलेल्या गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांकरिता करोनाप्रतिबंधक सोयीसुविधा दुप्पट करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज (पाच ऑगस्ट) ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

गणेशोत्सवासाठी रत्नागिरीत पाच ऑगस्टपासून एसटीचे बुकिंग; प्रवासाचे नियम जाहीर

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता एसटीची सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रत्नागिरीत उद्यापासून (पाच ऑगस्टपासून) एसटीचे आरक्षण सुरू होणार आहे. मुंबई, पुण्यातून येण्याचे, तसेच परतीच्या वाहतुकीचेसुद्धा आरक्षण उद्यापासून मिळणार आहे, असे रत्नागिरीच्या एसटी विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

गणेशोत्सवासाठी रत्नागिरीतून सिंधुदुर्गात जाऊ इच्छिणाऱ्यांबाबत प्रश्नचिन्ह

रत्नागिरी : करोनाप्रतिबंधाचा उद्देश कायम ठेवून गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांच्या आठ ते १५ दिवसांच्या वास्तव्याबाबत शासनाने स्पष्ट निर्णय घेण्याची आणि नियोजन करण्याची चाकरमान्यांनी मागणी केल्यानंतर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली; मात्र चाकरमान्यांचे विलगीकरण १४ दिवसांचे होणार की सात दिवसांचे, संस्थात्मक की गृह विलगीकरण याबाबत अद्यापही शासन आणि प्रशासनाने काहीही स्पष्ट केलेले नाही. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग या आपल्या मूळ जिल्ह्यात उत्सवासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांबाबतचा कोणताच विषय पुढे आलेला नाही.

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेगाड्या सोडण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य शासनाने कोकण रेल्वेमार्गावर गाड्या सोडण्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क साधावा, असे निवेदन मुंबईतील चाकरमान्यांनी