ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा हृद्य सत्कार करून रत्नागिरीत भाजपचा वर्धापनदिन

रत्नागिरी : भाजपाच्या ४४ व्या वर्धापनदिनानिमित्त आज येथील दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपा कार्यालयात जनसंघ, भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

भाजपचे रविवारपासून गाव चलो अभियान

रत्नागिरी : भाजपच्या गाव चलो अभियानाला रविवारपासून (दि. ४ फेब्रुवारी) प्रारंभ होणार असून अभियानाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कार्याची यशोगाथा गावागावात पोहोचवणार असल्याची माहिती सचिन वहाळकर अभियानाचे जिल्हा संयोजक सचिन वहाळकर यांनी दिली.

खेडशी गावाने नववर्षदिनी केले विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, एक जानेवारी २०२४ रोजी रत्नागिरी तालुक्यातल्या खेडशी गावात विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत करण्यात आले.

विकसित भारत संकल्प यात्रेचे रत्नागिरी शहरात उत्साहात स्वागत

विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे आज (२७ डिसेंबर) रत्नागिरी शहरातल्या लक्ष्मी चौकात उत्साहात स्वागत करण्यात आले.

फेरबदलासह राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; अजित पवार अर्थमंत्री, तर वळसे-पाटील सहकारमंत्री

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (१४ जुलै २०२३) खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

उशिरा सुचलेले शहाणपण

मोठे आंदोलन उभे राहिल्यानंतर प्रशासनाला आता स्थानिक ग्रामस्थांशी समन्वय साधण्याचा उपाय सुचला आहे. पण ही पश्‍चात बुद्धी म्हणता येईल. स्थानिक ग्रामस्थांना केवळ गृहीत धरले जाते. त्यांना समजून सांगण्याची आणि त्यांना समजावून घेण्याची भूमिका प्रशासन कधीच घेत नाही. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर प्रशासन धडपडत आहे, पण एकदा प्रशासनाच्या विरोधात मत झाले की ते पुन्हा प्रशासनाच्या बाजूने व्हायला खूप काळ जावा लागेल. त्यात वेगवेगळ्या पक्षांचे लोकप्रतिनिधी आपापल्या राजकीय सोयीनुसार विविध मतमतांतरे प्रकट करत असतात.