रायगड किल्ला आणि परिसर पाच दिवस पर्यटकांसाठी बंद

महाड (जि. रायगड) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या रायगड किल्ला दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितेचा कारणास्तव रायगड किल्ला, रायगड रोपवे व परिसर पर्यटकांसाठी ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीमध्ये बंद ठेवण्यात येणार आहे.

कोकण कट्टा संस्थेतर्फे बालग्राम प्रकल्पाला मदत

मुंबई : कोकण कट्टा या विलेपार्ले येथील विविध क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्थेने पेण (जि. रायगड) येथील ग्रामसंवर्धन संस्थेच्या वंचित मुलांसाठी सुरू केलेल्या बालग्राम प्रकल्पासाठी सुमारे बाराशे किलो धान्य, टी-शर्ट, शूज, चादरी आणि शालेय साहित्य दिले.

महाड इमारत दुर्घटनेत दोन ठार, ६० जण सुखरूप; २६ जण अद्याप ढिगाऱ्याखाली

महाड : महाड (जि. रायगड) येथील तारीक गार्डन ही पाचमजली इमारत काल (ता. २४) कोसळली. केवळ सात वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत दोघे ठार, तर आठ जण जखमी झाले. इमारतीतील ६० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, आणखी २६ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मदत व बचावकार्य सुरू आहे.

रायगडावरच्या दीडशे वर्षांनंतर भरलेल्या हत्ती तलावाचे संभाजीराजांनी केले पूजन

शिवरायांची राजधानी असलेल्या दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ल्यावरील हत्ती तलाव १५० वर्षांनंतर काठोकाठ भरला आहे. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी तलावाला १८ जुलै २०२० रोजी भेट देऊन तलावातील पाण्याचे पूजन केले आणि ओंजळीने तलावाचे पाणी पिऊन तृप्तता अनुभवली.

‘निसर्ग’मुळे कोकण कृषी विद्यापीठाच्या सुपारी संशोधन केंद्राचे प्रचंड नुकसान; ‘जीआय’ १० वर्षे लांबणार

रत्नागिरी : गेल्या तीन जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुपारी संशोधन केंद्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुपारीची लागवडच उद्ध्वस्त झाल्याने विद्यापीठाने विकसित केलेल्या सुपारीच्या श्रीवर्धनी प्रजातीला भौगोलिक निर्देशन (जीआय) मिळवून देण्याची प्रक्रिया तर तब्बल दहा वर्षे लांबणार आहे. त्यामुळे विद्यापीठाबरोबरच बागायतदारांचेही नुकसान होणार आहे.

वादळानंतर अद्यापही सरकारकडून कोकणाला पुरेशी मदत नाही : फडणवीस यांची टीका

रत्नागिरी : ‘कोकणातील चक्रीवादळानंतरची परिस्थिती पाहून शासनाने मदत केल्याचे दिसत नाही. शासनाचे अस्तित्वच दिसत नाही,’ अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस यांनी आज (१२ जून) रत्नागिरी जिल्ह्यातील चक्रीवादळाने नुकसान झालेल्या दापोली आणि मंडणगड तालुक्यांचा दौरा केला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.