संघशताब्दीनिमित्त संघ गंगा के भगीरथ नाटकाचा रत्नागिरीत गुरुवारी प्रयोग

संघ गंगा के भगीरथ

कथा आणि गीतगायनातून उलगडला शिवइतिहास

रत्नागिरी : शिवजन्म ते शिवरायांच्या राज्याभिषेकापर्यंतची शिवकथा अनुभवताना शिवप्रेमींच्या अंगावर रोमांच उभे राहिले. सुप्रसिद्ध प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांनी शिवइतिहास उभा करताना शिवरायांइतकीच किंबहुना त्याहून अधिक जिजाऊंच्या विचारांची देशाला खरी गरज असल्याचे प्रतिपादन केले.

सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगरावर रुजतोय नव्या आशेचा अंकुर

जैवविविधता कमी होतेय; डोंगर उघडेबोडके होताहेत; वानरं-माकडं, हत्तींपासून बिबट्यांपर्यंत अनेक वन्यजीव मानवी वस्तीत येताहेत अशी परिस्थिती कमी-अधिक फरकाने सगळीकडेच अनुभवायला मिळते आहे. त्यावर कोणते उपाय करता येतील, याबद्दल चर्चा झडत आहेत. नियतकालिकांची पानं आणि वेबसाइट्सची पेजेस याबद्दलच्या माहितीने भरभरून वाहत आहेत. ती परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे हात मात्र तुलनेने फारच थोडे आहेत. या मोजक्या हातांमध्ये समावेश होतो तो सावंतवाडीतले (जि. सिंधुदुर्ग) अँड्र्यू फर्नांडिस आणि त्यांचे दोन मुलगे डॅनियल आणि फ्रँकलीन यांचा.

‘‘अजेय भारत’मधून वैभवशाली इतिहासाचे साक्षेपी लेखन’

सुधा रिसबूड लिखित व कॉन्टिनेन्टल प्रकाशित ‘अजेय भारत’ (पाचवे शतक ते १२ वे शतक – भारतीय इतिहासाचा देदीप्यमान कालखंड) या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते १३ ऑक्टोबर २०२० रोजी पुण्यात झाले.

हिंदू संघटन म्हणजेच विषमता निर्मूलन : सरसंघचालक

पुणे : ‘दत्तोपंत ठेंगडी यांनी आपल्या अंतिम श्वासापर्यंत विषमता निर्मूलनाचा, समरसतेचाच विचार केला. समरसता ही त्यांची श्रद्धा होती. प्रचंड व्यासंग आणि आशयाच्या मुळाशी जाण्याची त्यांची दृष्टी होती. त्यातूनच त्यांनी विविध क्षेत्रात संघटना स्थापन केल्या आणि त्यांना देश-काल-परिस्थितीशी सुसंगत असे मार्गदर्शनदेखील केले. हे सर्व करत असताना त्यांनी हिंदू समाजाचे संघटन म्हणजेच विषमता निर्मूलन हे सूत्र कायम बाळगले,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी १४ ऑक्टोबर रोजी पुण्यात केले.

रत्नागिरीतील फाटक प्रशालेचे निवृत्त उपमुख्याध्यापक श्रीराम रायकर यांचे निधन

रत्नागिरी : येथील फाटक प्रशालेचे निवृत्त उपमुख्याध्यापक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, राष्ट्रीय सेवा समितीचे माजी अध्यक्ष श्रीराम पांडुरंग तथा शामराव रायकर (वय ७४) यांचे २९ सप्टेंबर २०२० रोजी पहाटे कोल्हापूर येथे निधन झाले.