स्वातंत्र्यावर मर्यादा हवी

लोकांनी आपल्या प्रतिनिधींना सभागृहामध्ये उपस्थित राहून काम करण्यासाठी निवडून दिलेले असते. सातत्याने सभात्याग करणे म्हणजे लोकांच्या मतांचा अनादर आणि त्यांच्याशी केलेली प्रतारणाच आहे. भलेही सरकारने मांडलेले मुद्दे पटत नसले, तरी त्यासाठी सभागृहातून बाहेर पडायलाच हवे असे नाही. किंबहुना लोकप्रतिनिधींनी सभागृहात उपस्थित राहणेच अत्यावश्यक आहे. ते सभागृहातील नियोजित कामकाजाच्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक वेळ सभागृहात उपस्थित राहिले नाहीत, तर ती त्यांची अनुपस्थिती समजून खासदारकीच रद्द करण्याची तरतूद केली गेली पाहिजे.

सायबर संस्कारांना प्रारंभ

आजच्या युगात सायबर संस्कार या सतराव्या संस्काराची गरज आहे, हे पटवून देणारा एक कार्यक्रम रत्नागिरीत अभियंता अक्षय फाटक यांनी अलीकडेच केला. मोबाइलमुळे फसवणुकीचे जे अनेक गुन्हे घडतात, त्याचे सविस्तर विश्लेषण त्यांनी केले. राजापूर तालुक्यातील एका गावाने याबाबतचे एक चांगले उदाहरण घालून दिले आहे. वयाची १८ वर्षे होईपर्यंत आपल्या मुलाला पालकांनी वैयक्तिक मोबाइल घेऊन देऊ नये, असा निर्णय या गावात घेण्यात आला आहे.

छत्र्या नकोत, शिक्षक हवेत

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या चिन्हासह नेत्यांचे फोटो असलेल्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली की प्रचारावर बंधने येतात. पण त्याच्या आधीपासूनच उघडपणे प्रचार केला, तर उपयोग होतो, हे लक्षात घेऊन छत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे. अशा प्रचारात कल्पकता नक्कीच आहे; पण शाळांमधून प्रचार करणे योग्य आहे का, याचा विचार करायला हवा. शिवाय मुलांना छत्र्या देण्यापेक्षा पुरेसे शिक्षक दिले, तर शिक्षणाचा दर्जा सुधारायला मदत होणार आहे. त्याची खरी गरज आहे.

खरेदी करताय? स्थानिक ठिकाणी की ऑनलाइन?

होळी, गुढीपाडवा, नवरात्र, दसरा, दिवाळी अशा सर्व सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. आजकाल सर्व तऱ्हेची ऑनलाइन खरेदी सोपी झाली आहे. स्थानिक ठिकाणी कोणतीही खरेदी करण्यापेक्षा ग्राहकांचा घरपोच माल पोहोचविणाऱ्या ऑनलाइन खरेदीवर भर असतो. का केली जाते ऑनलाइन खरेदी? स्थानिक आणि ऑनलाइन खरेदीचे फायदे-तोटे काय, याविषयी लांज्यातील सुखानंद कुलकर्णी यांनी लिहिलेला हा लेख…

बहुआयामी व्यक्तिमत्त्व : अरुअप्पा जोशी

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अरुअप्पा जोशी यांचा २८ फेब्रुवारी हा स्मृतिदिन ! त्यानिमित्ताने या कर्मयोग्याच्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा.

रत्नागिरीत २२ जानेवारीपासून कालिदास स्मृती व्याख्यानमाला

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे उद्यापासून (दि. १७ फेब्रुवारी) दोन दिवसांची कालिदास स्मृती समारोह व्याख्यानमाला होणार आहे. अज्ञात रामायण या विषयाची व्याख्याने त्यामध्ये होणार आहेत.