फेरबदलासह राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; अजित पवार अर्थमंत्री, तर वळसे-पाटील सहकारमंत्री

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (१४ जुलै २०२३) खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

दिशा मिळाली, लक्ष्य कोठे?

शिंदे शिवसेनेचे रत्नागिरी जिल्ह्यातील नेते तर संपूर्ण जिल्हा शिवसेनामय करण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत. विविध व्यासपीठांवरून त्याचाच उल्लेख केला जात आहे. याचाच अर्थ भाजपाला एकही जागा देण्याची त्यांची मानसिकता नाही. खासदारपद शिवसेनेचेच आहे, असेही ठामपणे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या विजय संकल्प मेळाव्याचा कितपत उपयोग होईल, हा प्रश्न आहे.

पक्षाचे चिन्हच देऊन टाकावे

ग्रामपंचायतीच्या निवडणुका निकोप वातावरणात व्हाव्यात, गावात सर्वच लोक एकमेकांना ओळखत असल्याने त्यांच्यामध्ये पक्षीय वाद निर्माण होऊ नयेत, गावाच्या विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी ग्रामपंचायतींच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाहीत. तसे संकेत आहेत. पण निवडून आल्यानंतर सर्वच पक्ष आपल्या पक्षाच्या विजयाचा दावा करताना दिसतात. तसे होणार असेल, तर ते मूळ लोकशाही निकषांनाच बगल देणारे ठरते. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमधील उमेदवारांनाही यापुढे पक्षाची चिन्हेच द्यावीत, हे बरे.

दसरा मेळावे : विचारांचे (?) सोने?

मुंबईत दसऱ्याला झालेल्या दोन मेळाव्यांमधून कुठल्याच गटाचे समर्थक अथवा विरोधक नसलेल्या मराठी जनांना नेमके काय मिळाले?

बंडखोर की तारणहार?

शिवसेनेतील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी आपली घुसमट व्यक्त केली. पण मुख्यमंत्री असलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यांनी पक्षानिष्ठेपेक्षाही पदच प्रतिष्ठेचे केले. एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनीच शिवसेनेच्या तत्त्वांशीच अडीच वर्षांपूर्वी बंडखोरी केली. त्याची निस्तरणीच शिंदे आता करत आहेत.

कामातून गतिमान प्रशासनाचा संदेश पोहोचवू या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ‘लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. शासन प्रशासन गतिमान आहे, हा संदेश आपल्या कामातून देऊ या,’ असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (३० जून २०२२) केले. मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिव, तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या वेळी बैठकीस उपस्थित होते.