हाती केवळ एक शून्य!

महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर कवी विंदा करंदीकर यांची ‘तेच ते आणि तेच ते’ ही कविता नेहमीच आठवते. रोज नवे काही घडत असल्याचे भासत असले तरी त्यात फारसे काही वेगळे नसते. राजकारण्यांच्या खेळामध्ये पाच वर्षांनी एकदाच खेळल्यानंतर फेकून देण्याच्या लायकीची प्यादी म्हणूनच आपला उपयोग झाला आहे, हे आपल्याला समजत असते. खेळ त्यांचा होतो. आपला जीव जातो. ते पाहायला त्यांच्याकडे वेळ नसतो. अशा स्थितीत आपण काहीही करू शकत नाही. विंदा करंदीकरांची कविता आपण जगत असतो.

सूडाच्या राजकारणात कोकणाची होरपळ

साप्ताहिक कोकण मीडियाच्या २७ ऑगस्टच्या अंकाचे संपादकीय

अशांततेचे हिडीस दर्शन

साप्ताहिक कोकण मीडियाच्या १९ फेब्रुवारी २०२१च्या अंकाचे संपादकीय

रत्नागिरीच्या मेडिकल कॉलेजचे काय झाले?

साप्ताहिक कोकण मीडियाच्या १२ फेब्रुवारी २०२१च्या अंकाचे संपादकीय

नाणारच्या कातळावरची पांढरी रेघ

साप्ताहिक कोकण मीडियाच्या ३१ जुलै रोजीच्या अंकाचे संपादकीय…

नाणार रिफायनरी प्रकल्पाची पुन्हा एकदा चर्चा सुरू

रत्नागिरी : गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाची भूमिका घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर काहीसा मागे राहिलेला प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आमदार श्री. जाधव यांनी रिफायनरी समर्थनाची भूमिका घेतल्याने प्रकल्प समर्थकांना बळ मिळाले असून, कोकणच्या विकासासाठी कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींनी भूमिका घ्यावी, असे आवाहन प्रकल्प समर्थकांकडून केले जात आहे.