कोकणातील कातळशिल्पे, शिवरायांचे किल्ले जागतिक वारसास्थळांच्या यादीत जाणार; ‘युनेस्को’कडून प्रस्ताव तत्त्वतः मंजूर

मुंबई : जागतिक वारसा दिनी (१८ एप्रिल) कोकणवासीयांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे. कोकणातील सुमारे १० हजार वर्षांपूर्वीचा वारसा असलेली कातळशिल्पे आणि छत्रपती शिवरायांनी बांधलेले सागरी व डोंगरी किल्ले यांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश होण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणामार्फत (ASI) सादर केलेल्या ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ आणि ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा युनेस्कोकडून तत्त्वत: स्वीकार करण्यात आला आहे.

पर्यटक कोकणात राहण्यासाठी यावेत यासाठी प्रयत्न : अनिल परब

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात येणारे पर्यटक दोन-चार दिवसांसाठी राहिले, तर जिल्ह्यातील स्थानिकांना रोजगार मिळेल. तसेच पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, हे लक्षात घेऊन पर्यटन धोरण आखले जाईल, अशी ग्वाही रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी दिली. रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेने आयोजित केलेल्या वारसा पर्यटन या विषयावरील तिसऱ्या शाश्वत पर्यटन परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

राज ठाकरे डिसेंबरमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील कातळ-खोद-चित्रे पाहणार

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे येत्या डिसेंबरमध्ये कोकणातील पुरातन ठेवा असलेली कातळ-खोद-चित्रे पाहण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

पूर्वजांच्या पाषाणखुणांच्या शोधाची गोष्ट : कोकणातील कातळ-खोद-चित्रे

गेल्या चार-पाच वर्षांत कोकणातील अनेक ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण खजिन्याचा शोध लागला आहे. तो खजिना म्हणजेच कातळ-खोद-चित्रे किंवा कातळशिल्पे. हा १० हजार वर्षांपूर्वीच्या मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील ज्ञानाचा मोठा खजिना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या चित्रांमधील विविध रचना, त्यांचे आकार, शैली, मिळालेली दगडी हत्यारे याच्या आधारे भारताच्या प्रागैतिहासिक कालखंडावर नव्याने प्रकाश टाकला जाऊ शकतो. पूर्वजांच्या पाषाणखुणा असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण गूढ रचनांचा शोध कसा लागत गेला, कोणत्या संकेतांच्या आधारे स्थानिक अभ्यासक वेगवेगळ्या रचनांपर्यंत पोहोचले, त्याच्याशी जोडलेल्या आख्यायिका कोणत्या आहेत, या ठेव्याच्या संरक्षणासाठी काय केले जात आहे, या गोष्टींबद्दल अनेकांना कुतुहल आहे. हे शोधकार्य ज्या स्थानिक अभ्यासकांनी कुतुहलाने केले आणि हा ठेवा जगासमोर आणला, ते सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनीच मांडलेला हा शोधकार्याचा गूढरम्य प्रवास…