महाराष्ट्रात ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू

मुंबई : करोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यात ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ३० मे रोजी रात्री समाजमाध्यमावरून केलेल्या भाषणात ही माहिती दिली.

रत्नागिरी जिल्ह्यात यापुढे करोनाबाधितांचे गृह विलगीकरण बंद, टाळेबंदीत वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात यापुढे करोनाबाधितांना गृह विलगीकरणात ठेवण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे आदेश दिल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी ब्रेक दे चेनअंतर्गत लागू केलेली टाळेबंदी येत्या १ जूनपर्यंत लागू राहणार आहे.

`ब्रेक दि चेन’ अंतर्गत संचारबंदीमध्ये काय सुरू असेल? काय बंद असेल?

मुंबई : राज्यात आज, (१४ एप्रिल) रोजी रात्री ८ वाजल्यापासून १ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत काय सुरू राहील आणि काय बंद असेल, कुठल्या सेवा, आस्थापना सुरू असतील, कुठल्या बाबींसाठी सूट असेल आदींबाबतची माहिती राज्य शासनाच्या नियमावलीत देण्यात आली आहे.

हृदयी बाबा तुमची ज्योत… (डॉ. आंबेडकरांना गीतातून अभिवादन)

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी रत्नागिरीतील श्रीकांत ढालकर यांनी लिहिलेलं आणि सादर केलेलं हे गीत…

राज्यात १४ एप्रिलपासून १ मेपर्यंत कडक संचारबंदी

मुंबई : करोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता. १३) रात्री केली. उद्या, बुधवार, १४ एप्रिल रोजी रात्री आठ वाजल्यापासून १ मेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.

२२ डिसेंबरपासून राज्यात महानगरपालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी

मुंबई : ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी आज (२१ डिसेंबर) बैठक घेतली. राज्यात उद्यापासून (२२ डिसेंबर) महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पाच जानेवारी २०२१पर्यंत अशी संचारबंदी लागू राहील.