… तर ॲन्टीजेन टेस्ट करूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याबाहेरून प्रवेश करण्याकरिता करोनाप्रतिबंधात्मक लशीच्या दोन मात्रा किंवा प्रवेशापूर्वी ७२ तास पूर्वीचा RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत नसल्यास अशा प्रवाशांची मोफत रॅपीड अँटिजेन तपासणी केली जाईल. तशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आज दिल्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी पहाटे चार वाजल्यापासून तौते चक्रीवादळ

सिंधुदुर्गनगरी : अरबी समुद्रात निर्माण झालेले तौते चक्रीवादळ जिल्ह्याच्या समुद्रात रविवारी, १६ मे रोजी दाखल होत आहे. पहाटे ४ वाजता ते जिल्ह्याच्या समुद्रात दाखल होणार असून दुपारी २ वाजल्यानंतर ते जिल्ह्यातून पुढे जाईल. या काळात नागरिकांनी अधिक दक्ष राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.

तौते चक्रीवादळ रविवारी, १६ मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यात

रत्नागिरी : अरबी समुद्रात सुरू झालेले तोक्ती चक्रीवादळ रविवारी, १६ मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यांच्या जवळून समुद्रातून गुजरातच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली असून वादळाच्या स्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्नारायण मिश्रा यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

कोकणातील मच्छीमारांसाठी ६५.१७ कोटींचे पॅकेज : उदय सामंत

रत्नागिरी : कोकणातील ५४ हजार ५७३ सागरी मच्छीमारांसाठी राज्य शासनाने ६५ कोटी १७ लाख रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. क्यार, महा चक्रीवादळांमध्ये झालेले नुकसान, तसेच करोनामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर हे पॅकेज जाहीर करण्यात आल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी पालकमंत्री उदय सामंत यांनी आज (२६ ऑगस्ट) ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

चक्रीवादळामुळे रायगडात काही लाख घरांचे नुकसान; रत्नागिरीत तीन हजार झाडे जमीनदोस्त

रत्नागिरी/मुंबई : तीन जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात लाखो घरांचे नुकसान झाले आहे. एक लाखाहून जास्त झाडे पडली आहेत. तसेच, रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि मंडणगडमध्ये जास्त नुकसान झाले आहे. तेथे तीन हजार झाडे आणि विजेचे एक हजार ९६२ खांब मोडून पडले आहेत. रत्नागिरीत महावितरणची १४ उपकेंद्रे कालच्या वादळात नादुरुस्त झाली असून, ती दुरुस्त करण्याचे काम सुरू झाले आहे.

चक्रीवादळ अखेर मंदावले; अचूक अंदाज, योग्य नियोजनामुळे जीवितहानी टळली

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी/अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळच्या किनाऱ्यावर ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने धडकलेले निसर्ग चक्रीवादळ अखेर मंदावले आहे. या वादळामुळे