वाशिष्ठी खाडीवरच्या मालदोलीमधील शंभर वर्षांपूर्वीच्या वैशिष्ट्यपूर्ण वारसा वास्तूत आता वृद्धांसाठी‘आनंदाश्रम!’

कोकणातल्या वाशिष्ठी खाडीच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर वसलेल्या मालदोली गावात १९२० च्या आसपास उभारण्यात आलेली आणि पर्यटनात शास्त्रीय वेगळेपणा जपणारी ‘रामचंद्र वासुदेव मराठे न्यास’ ही हेरिटेज वास्तू येत्या रविवारी (२४ ऑक्टोबर २०२१) वृद्धांचे ‘आनंदाश्रम’ बनून नव्याने सर्वांच्या समोर येत आहे. या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूबद्दल आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाबद्दल धीरज वाटेकर यांनी लिहिलेला लेख…

पर्यटन परिषद झाली; पण रत्नागिरी अपरिचितच!

साप्ताहिक कोकण मीडियाच्या १ ऑक्टोबरच्या अंकाचे संपादकीय

पर्यटक कोकणात राहण्यासाठी यावेत यासाठी प्रयत्न : अनिल परब

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात येणारे पर्यटक दोन-चार दिवसांसाठी राहिले, तर जिल्ह्यातील स्थानिकांना रोजगार मिळेल. तसेच पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, हे लक्षात घेऊन पर्यटन धोरण आखले जाईल, अशी ग्वाही रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी दिली. रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेने आयोजित केलेल्या वारसा पर्यटन या विषयावरील तिसऱ्या शाश्वत पर्यटन परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

‘तांबट’ पक्ष्याचा फराळ!

दिवाळीच्या दिवसांत परसातल्या उंबराच्या झाडावर फळं खाणाऱ्या तांबटाच्या जोडीचं सुखद दर्शनधीरज वाटेकर यांना घडलं आणि त्यांच्या फराळाचा सोहळा त्यांना अनुभवता आला, त्याबद्दल त्यांनी लिहिलेला हा लेख…

निसर्गाचं वर‘दान’ सांभाळू या!

अधिक (पुरुषोत्तम) मास सुरू आहे. भारतीय जीवनपद्धतीनुसार, या महिन्यात केलेल्या सत्पात्री दानाचं फळ शतपटीने अधिक मिळण्याची मान्यता आहे. इतर दानांप्रमाणे निसर्गाचं वर‘दान’रूपी सान्निध्यही मनुष्याला समाधान प्राप्त करून देतं. म्हणूनच निसर्ग सान्निध्याचा वसा आणि वारसा संवर्धित करून पुढील पिढीकडे जसाच्या तसा सुपूर्द करण्यासाठी मनुष्याने अधिक मासानिमित्ताने पावलं उचलायला हवीत. त्या निमित्ताने धीरज वाटेकर यांनी लिहिलेला हा लेख…