मराठीत अनेक म्हणी आणि वाक्प्रचार आहेत. त्यापैकी न कर्त्याचा वार शनिवार हा एक आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात शनिवारी करू नये. त्यादिवशी सुरू केलेली कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत, कार्याला गती प्राप्त होत नाही. कधी कधी तर कामे एवढी रखडतात की ती अर्ध्यातून सोडून द्यावी लागण्याची परिस्थिती ओढवते, असा समज आहे. याला समाजाला संपूर्ण छेद देत नकर्त्याचा नव्हे, तर कर्त्याचा वार शनिवार असा नवा वाक्प्रचार अस्तित्वात आला आहे.