सडामिऱ्या येथे वीर सावरकरांचा स्मृतीस्तंभ उभारण्याची मागणी

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या सडामिऱ्या (ता. रत्नागिरी) येथील ऐतिहासिक स्थळाचे संवर्धन करण्याबाबत रत्नागिरीकरांच्या वतीने पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना कथ्थक नृत्यपुष्पांजली वाहून मानवंदना

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीचे औचित्य साधून येथील नटराज नृत्यवर्गातर्फे ‘अनादि मी अनंत मी’ या कार्यक्रमाद्वारे नृत्यपुष्पांजली अर्पण केली.

हिंदुत्वाच्या रक्षणाची जबाबदारी सर्वांना घ्यावी लागेल- मंगलप्रभात लोढा

रत्नागिरी : भारताला हिंदुराष्ट्र बनविण्यासाठी स्वा. सावरकर यांनी हिंदुत्व ग्रंथ लिहिला. त्याची यंदा शताब्दी सुरू आहे. भारतीय संस्कृतीचे रक्षण, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सर्वांना जबाबदारी घ्यावी लागेल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता तसेच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी येथे केले.

सावरकर विचार जागरण सप्ताहाची रत्नागिरीत सांगता

रत्नागिरी : शोभायात्रा आणि पतितपावन मंदिरातील सहभोजनाने सावरकर विचार जागरण सप्ताहाची आज रत्नागिरीत सांगता झाली. वीर सावरकरांना अभिवादन करण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री उदय सामंत, पद्मश्री भिकुजी इदाते उपस्थित होते.

विनायका रे संगीत कार्यक्रमातून स्वा. सावरकरांना आदरांजली

रत्नागिरी : प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या आघाडीच्या गायक जोडीने विनायका रे या संगीत कार्यक्रमातून स्वा. वि. दा. सावरकर यांना आदरांजली वाहिली.

सावरकरांच्या काव्यावर आधारित कथ्थक नृत्याचा रविवारी आविष्कार

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या काव्यावर आधारित कथ्थक चा कार्यक्रम रविवारी (दि. २८ मे) रत्नागिरीतील कथ्थक नृत्यशिक्षिका सोनम जाधव सादर करणार आहेत.