दिवा का लावायचा? आयुर्वेदातील विज्ञान काय सांगते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच एप्रिलला नऊ वाजता दीपप्रज्ज्वलन करायला सांगितले आहे, त्यावर अनेकांनी टीका केली आहे. पंतप्रधानांनी सांगितलेल्या गोष्टीमागे वैज्ञानिक दृष्टिकोन काय असावा, याविषयी जाणून घेण्यासाठी *लांजा येथील चैतन्य घाटे या BAMSच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याने* मुंबईतील *वैद्य अरुण मिश्रा* यांच्याशी संपर्क साधला. आयुर्वेदातील व्याधीविचार किती व्यापक असतो आणि त्यावर असे उपाय कशा प्रकारे कार्य करू शकतात, याबद्दल त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कोरोना महामारीचा प्रतिकार आणि प्रतिबंध : आयुर्वेद काय सांगतो?

कोरोना विषाणूच्या संसर्गाने सध्या सारे जग व्यापले आहे. या पार्श्वभूमीवर, या महामारीच्या प्रतिबंधासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदातील उपाययोजनांचा चांगला उपयोग होऊ शकतो. सावंतवाडी येथील ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य मुरलीधर प्रभुदेसाई यांनी याविषयी केलेले हे मार्गदर्शन…

रत्नागिरीत आढळला दुसरा करोनाबाधित रुग्ण; निर्बंध अधिक कडक

रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाचा एकमेव रुग्ण बरा होत असतानाच रत्नागिरीत आणखी एक करोनाबाधित रुग्ण आज (तीन एप्रिल २०२०) आढळला आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. आणखी एक रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा प्रचंड वेगाने कामाला लागली आहे.

‘करोना’ची लक्षणे ओळखण्यासाठी सरकारचे ऑनलाइन स्वयंचाचणी टूल

करोना विषाणूचा संसर्ग झाल्याची प्राथमिक लक्षणे नागरिकांना स्वतःच ओळखता यावीत, यासाठी महाराष्ट्र सरकारने सेल्फ असेसमेंट टूल (स्वयंचाचणी) विकसित केले आहे. हे टूल मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. वैद्यकीय सल्ला हवा असेल, तर आवश्यक ती माहिती आणि संपर्क क्रमांकही या लिंकवर उपलब्ध आहेत. तसेच, यावर चाचणी केलेल्यांच्या लक्षणांच्या स्वरूपाची माहिती प्रशासनापर्यंतही आपोआप पोहोचवली जाणार आहे.

रोगप्रतिकारशक्ती वाढवा; आयुष मंत्रालयाने सुचवली आयुर्वेदीय जीवनशैली

करोना विषाणूवर कोणतीही लस नसल्याने, तो होऊ नये म्हणून काळजी घेणे हेच आपल्या हाती आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितलेले आहेत. रोग होऊ नये म्हणून जीवनशैलीच आरोग्यपूर्ण असण्यावर आयुर्वेदाचा भर आहे. सध्याच्या परिस्थितीत ही जीवनशैली अंगीकारावी, अशी शिफारस केंद्रीय आयुष मंत्रालयाने केली आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने मंत्रालयाने काही आयुर्वेदिक उपाय सांगितले आहेत. त्यांचा अवलंब केल्यास शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होईल. नागरिकांनी ही जीवनशैली अंगीकारल्यास नक्की उपयोग होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वानुभवावरून सांगितले आहे.

रत्नागिरीकरांनो, ३१ मार्च आणि एक एप्रिलला रक्तदान करणार ना!

रत्नागिरी : करोना विषाणूसंसर्गाचे संकट ओढवलेले असल्यामुळे रक्तदान शिबिरे घेण्यावरही मर्यादा आली आहे. त्यामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, सुरक्षिततेचे सगळे निकष पाळून रत्नागिरीत ३१ मार्च आणि एक एप्रिल २०२० रोजी रक्तदान शिबिरे होणार आहेत. ३१ मार्चचे शिबिर ‘रत्नागिरी आर्मी’ने आयोजित केले आहे. तसेच, एक एप्रिलचे शिबिर अनुलोमतर्फे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये सहभागी होऊन रक्त संकलनाला हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.