साप्ताहिक कोकण मीडियाच्या १४ ऑगस्टच्या अंकाचे संपादकीय…
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
साप्ताहिक कोकण मीडियाच्या १४ ऑगस्टच्या अंकाचे संपादकीय…
दापोली : करोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सुचविलेल्या उपायांकडे, तसेच खासगी डॉक्टरांची सेवा घेताना त्यांच्या सुरक्षेकडे शासनाकडून होणारे दुर्लक्ष यामुळे कंटाळून जाऊन दापोलीतील डॉ. मेहेंदळे दाम्पत्याने आपले रुग्णालय एक सप्टेंबर २०२०पासून कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना शासनाच्या बदललेल्या निकषांनुसार वाढीव नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रामुख्याने घरे अंशतः बाधित झालेल्यांसाठी निकषांमध्ये
रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना शासनाच्या बदललेल्या निकषांनुसार वाढीव नुकसानभरपाई दिली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, गुहागर आणि रत्नागिरी तालुक्यातील आपद्ग्रस्तांना त्याचा फायदा होणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (२४ जून) दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) मुंबईतून घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. खासकरून अंशतः बाधितांच्या निकषांमध्ये बदल करण्यात आल्याने भरपाईपासून वंचित राहणाऱ्या हजारो आपद्ग्रस्तांना भरपाई मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.
निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीमधील दापोली, मंडणगड तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यातील केळशी गावात रत्नागिरीच्या ब्रह्मरत्न संस्थेमार्फत श्रमदान करण्यात आले.
रत्नागिरी : ‘कोकणातील चक्रीवादळानंतरची परिस्थिती पाहून शासनाने मदत केल्याचे दिसत नाही. शासनाचे अस्तित्वच दिसत नाही,’ अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस यांनी आज (१२ जून) रत्नागिरी जिल्ह्यातील चक्रीवादळाने नुकसान झालेल्या दापोली आणि मंडणगड तालुक्यांचा दौरा केला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.