आदिपंढरी वालावलच्या नारायणाची माळ पंढरपूरच्या विठोबाच्या गळ्यात

वालावल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील लक्ष्मीनारायणाच्या अंगावरील वस्त्र आणि तुळशीच्या मंजिऱ्यांची माळ घातल्यानंतरच महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाचा आषाढी एकादशीचा उत्सव सुरू होतो. या लक्ष्मीनारायणाचे मंदिर असलेल्या वालावल गावाला म्हणूनच ‘आदिपंढरी’ म्हणून ओळखले जाते. या मंदिरात आषाढी एकादशीला होणारा उत्सव यंदा करोनामुळे मोजक्या उपस्थितीत होत आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने, हे मंदिर आणि उत्सवाची माहिती देणारा लेख…

आषाढस्य प्रथम दिवसे – मूळ रचना आणि अनुवादांमधलं सौंदर्य

आज आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आषाढाचा पहिला दिवस. हा दिवस कविकुलगुरू कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. मेघदूत हे त्याचं महान काव्य. या काव्याच्या दुसऱ्या श्लोकाची सुरुवात ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ अशी होते. कालिदासाची जन्मतिथी माहिती नसल्याने त्याच्या काव्यातल्या या उल्लेखावरून आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदास दिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने मेघदूताच्या काही अनुवादांविषयी…

‘वानर आणि केल्ड्यांवर उपाय काढा, कोकण समृद्ध होयल’

रत्नागिरी : वानर आणि केल्ड्यांवर उपाय काढा, कोकण समृद्ध होयल, अशा संगमेश्वरी बोलीतील खणखणीत शब्दांत या वन्य प्राण्यांच्या उपद्रवाची कथा आणि शेतकऱ्यांची व्यथा लोककलाकार सचिन काळे यांनी मांडली.

सवतकड्याच्या निमित्ताने चुनाकोळवण!

कोकणातील धबधब्यांचे आकर्षण कोकणाबाहेरील अनेकांना असतेच. अशाच एका धबधब्याचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या मूळच्या कोकणवासीय चाकरमान्याने केलेले वर्णन निसर्गवेड्यांना त्या धबधब्याकडे घेऊन गेले नाही, तरच नवल!

टेंब्ये स्वामी महाराजांचा आत्मिक समाधान देणारा मठ – मु. पो. पोमेंडी

ह. भ. प. विष्णुबुवा कृष्ण पटवर्धन यांनी रत्नागिरीजवळच्या पोमेंडी गावात उभारलेल्या प. पू. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांच्या मठाला शंभरहून अधिक वर्षे होऊन गेली आहेत. आज आषाढ शुद्ध प्रतिपदा, टेंब्ये स्वामींची पुण्यतिथी. त्या निमित्ताने, टेंब्ये स्वामींचा हा आत्मिक समाधान देणारा पोमेंडी येथील मठ आणि त्याच्या संस्थापकांविषयी…

‘ग्रामविकासाचा रथ उत्तम प्रकारे हाकणारे सुधाभाऊ पेडणेकर आदर्शवत’

लांजा शहरातील नवोदित लेखक, पर्यटन अभ्यासक विजय हटकर यांनी लिहिलेल्या “जनसेवक सुधाभाऊ” या पुस्तकाचे श्री. गंगावणे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.