ग्रामीण साहित्य संमेलनामुळे कोकणाचा जगात प्रचार : रवींद्र प्रभुदेसाई

तळवडे (ता. राजापूर) : ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामुळे स्वर्गीय कोकणभूमीचा जगभरात प्रचार व्हायला मदत होईल, असा आशावाद पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केला.

आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनासाठी तळवडे सज्ज

तळवडे (ता. राजापूर) : राजापूर लांजा नागरिक संघाचे आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन राजापूर तालुक्यातील तळवडे येथे ११ आणि १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी तळवडे नगरी सज्ज झाली आहे.

क्रांतीज्योत फेरीने आठव्या ग्रामीण साहित्य संमेलनाची वातावरणनिर्मिती

लांजा : तळवडे (ता. राजापूर) येथे होणार असलेल्या आठव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या वातावरणनिर्मितीसाठी राणी लक्ष्मीबाई क्रांती ज्योत फेरी काढण्यात आली. तिचा प्रारंभ कोट (ता. लांजा) येथे झाला. सरपंच सौ निशिगंधा नेवाळकर यांच्या हस्ते क्रांतीज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले.

आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रकाश देशपांडे

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या निसर्गरम्य तळवडे गावात १० ते १२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे. चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे आधारस्तंभ आणि चतुरस्र व्यक्तिमत्त्व असलेले प्रकाश देशपांडे या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.

पुस्तकांशिवाय भवितव्य नाही – प्रकाश देशपांडे

अलोरे (ता. चिपळूण) : पुस्तकांशिवाय भवितव्य नाही. आपापसातील मतभेद मिटवायचे असतील, किल्मिषे दूर करायची असतील, तर पुस्तकांशिवाय दुसरा मार्ग नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहास संशोधक प्रकाश देशपांडे यांनी केले.

‘१९४२ चिपळूण’मधून चिपळूणच्या इतिहासाची माहिती – आमदार शेखर निकम

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे ऑगस्ट क्रांतिदिनी ‘१९४२ चिपळूण’ या पुस्तकाचे प्रकाशन थाटात झाले.