कोकण मीडियाच्या सत्त्वश्री प्रकाशनाची पुस्तके मॉरिशसमध्ये

रत्नागिरी : येथील कोकण मीडियाच्या सत्त्वश्री प्रकाशनाने प्रकाशित केलेली पुस्तके मॉरिशस येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या समृद्ध ग्रंथालयाला भेट म्हणून देण्यात आली. लांजा येथील साहित्यिक सौ. विजयालक्ष्मी देवगोजी यांनी ही पुस्तके सुपूर्द केली.

Continue reading

पर्यटनात लांज्याला मानाचे स्थान मिळवून देऊ या : विजय हटकर

लांजा : कोकणातील निसर्गरम्य लांजा तालुका वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांनी समृद्ध असून कोकण पर्यटनात लांज्याला मानाचे स्थान मिळवून देऊ या, असे आवाहन कोकण पर्यटन अभ्यासक आणि रत्नसिंधु टुरिझमचे संचालक प्रा. विजय हटकर यांनी येथे केले.

Continue reading

संपकाळाचे वेतन कापावेच!

संपाच्या काळातील वेतन मिळणार नाही, असा कायदाच करायला हवा. संप कितीही काळ करावा. आपल्या मागण्या सहजी मान्य होत नसतील, तर त्या मांडण्यासाठी संप करणे हा कर्मचाऱ्यांचा हक्कच आहे. तो त्यांना अवश्य बजावू द्यावा. पण त्यांच्या संपामुळे सर्वसामान्यांना जी झळ पोहोचली, तशी झळ या कर्मचाऱ्यांनाही पोहोचली पाहिजे. संपाची झळ काय असते, याची जाणीव त्यांनाही झाली पाहिजे.

Continue reading

बिनकामाचे वेतन कशासाठी?

राज्यातील दोन टक्के कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. निवृत्तीनंतरचे भरभक्कम वेतन हा त्यांना त्यांचा हक्क वाटतो. पण कोणतीही शाश्वती नसलेले, तुटपुंज्या वेतनात काम करणारे कर्मचारी, मानधनावर काम करणारे कर्मचारी, मोलमजुरीवर जगणारे मजूर आणि यापैकी काहीही मिळत नसलेले कोट्यवधी बेरोजगार महाराष्ट्रात आहेत. काहीही काम न करता शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्यापेक्षा तेच वेतन या बेरोजगारांना, तुटपुंजे वेतन, मानधन घेणाऱ्यांना दिले, तर त्यांना कितीतरी मदत होणार आहे.

Continue reading

पर्यटन परिषदेचे फलित

पहिल्या चार वर्षांच्या परिषदांमध्ये पर्यटनाचे पर्यटनाच्या विकासाचे अनेक मुद्दे मांडले गेले असले तरी पर्यटन व्यावसायिकांनी एकत्र आले पाहिजे, रस्त्यांसारख्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत आणि आपला व्यवसाय वाढविला पाहिजे, या विचारापलीकडे त्यातून फारसे काही निष्पन्न झाल्याचे दिसत नाही. यावर्षीची परिषद मात्र काहीशी वेगळी ठरली, असेच म्हणावे लागेल. कारण याच परिषदेत अनाहूतपणे मांडल्या गेलेल्या एका मुद्द्यावर एकदम एक कोटीच्या निधीची घोषणा झाली. तेच या परिषदेचे फलित होते.

Continue reading

माचाळ : दोनशे वर्षांपूर्वीच्या गावाची जितीजागती प्रतिकृती

रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून नावारूपास आलेल्या आणि एकविसाव्या शतकातही दोनशे वर्षांपूर्वीचेच गावपण जपणाऱ्या माचाळ गावाचा परिचय करून देणारा लेख.

Continue reading