आठ मार्चनंतर पुण्या-मुंबईतून रत्नागिरीत आलेल्यांनी सक्तीने घरीच राहावे; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रत्नागिरी : मुंबई व पुणे शहरातून आठ मार्च २०२०नंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेल्या व्यक्तींनी राहत्या ठिकाणातून/घरातून बाहेर पडू नये, असे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर दंडनीय कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

साठेबाजी, काळ्या बाजाराला प्रतिबंध; जीवनावश्यक वस्तूंच्या सहज उपलब्धतेकरिता व्यापाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

रत्नागिरी : सध्या राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि संचारबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तू व सेवा उपलब्ध करून देताना व्यापाऱ्यांकडून साठेबाजी, तसेच काळा बाजार झाल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यांच्यासाठी काही सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊन गर्दी करू नये, जीवनावश्यक वस्तू सुरळीतपणे उपलब्ध होणार आहेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

का झाला 'आकाशवाणी रत्नागिरी'च्या कार्यक्रमांमध्ये बदल?

रत्नागिरी : आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून २४ मार्च २०२० रोजी नेहमीचे कार्यक्रम प्रसारित झाले नाहीत. करोना आजाराच्या प्रतिबंधासाठी गर्दी टाळण्याकरिता शक्य असेल तेथे शासकीय आणि खासगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा आणण्यात आली आहे. त्यामुळे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रातही मोजकेच कर्मचारी होते आणि स्थानिक कार्यक्रमांचे प्रसारण नेहमीप्रमाणे होऊ शकले नाही. त्यामुळे आकाशवाणीच्या नियमित श्रोत्यांना नेहमीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेता आला नाही. हीच स्थिती आणखी काही दिवस राहणार आहे.

नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याची रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

रत्नागिरी : करोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी जीवनाश्यक वस्तू मिळणाऱ्या दुकानात गर्दी टाळणे गरजेचे आहे. त्यामुळे जीवनाश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी ग्राहकांना त्या वस्तू घरपोच देण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या आहेत.

Representational

रत्नागिरीसह जिल्ह्यातील नऊ शहरांत दुचाकीवरून एकट्यालाच जाता येणार

करोनाच्या प्रतिबंधासाठी रत्नागिरी जिल्ह्यात कलम १४४ म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ही जमावबंदी नागरी (शहरी) भागांसाठी आहे. रत्नागिरीसह खेड, चिपळूण आणि राजापूर, नगरपालिकांचे क्षेत्र, तसेच मंडणगड, दापोली, गुहागर, देवरूख आणि लांजा या नगरपंचायतीच्या क्षेत्रांमध्येही जमावबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी केली जात आहे. या सर्व शहरांमध्ये दुचाकीवरूनही एकच व्यक्ती प्रवास करू शकेल. दुचाकीवर दुसरी व्यक्ती दिसली, तर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला शिक्षा केली जाईल.

कलम १४४ : काय करावे, काय करू नये? रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

‘२२ मार्चच्या मध्यरात्रीपासून राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यात करोना संसर्ग टाळण्यासाठी कलम १४४ (जमावबंदी) लागू झाले आहे. आता प्रत्येकाने स्वत: व स्वत:च्या कुटुंबासाठी प्रशासनाला सहकार्य करून कलम १४४ची प्रभावी अंमलबजावणी करावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.

या कालावधीत काय करावे, काय करू नये, कोणत्या सेवा सुरू, कोणत्या सेवा बंद राहणार आहेत, याची जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली ही माहिती..