राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वर्चस्व

मुंबई : एकसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सिंधुदुर्ग-रत्नागिरी केंद्रातून पहिले तिन्ही क्रमांक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाटकांना मिळाले आहेत.

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा रत्नागिरीत समारोप

रत्नागिरी : राज्य शासनाच्या एकसष्टाव्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची रत्नागिरी केंद्रावरील प्राथमिक फेरी काल (दि. १२ डिसेंबर) रात्री समाप्त झाली. या फेरीत १० संस्थांची नाटके सादर करण्यात आली.

पतीचे भरकटलेले तारू परतते पत्नीच्याच किनाऱ्यावर!

एकसष्टाव्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर सुरू असलेल्या प्राथमिक फेरीत आज (१२ डिसेंबर २०२२) किनारा हे नाटक रत्नागिरीतील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळ सादर करणार आहे. हे प्राथमिक फेरीतील अखेरचे नाटक आहे. सागरामध्ये भरकटलेले जहाज कधी ना कधी किनाऱ्याला येतेच. मानवी जीवनात स्त्री हाच कुटुंबाचा किनारा असते. हे दाखविणारे हे नाटक जयवंत दळवी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरले आहे.

कौटुंबिक गुंतागुंतीच्या प्रश्नाची उकल

एकसष्टाव्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर सुरू असलेल्या प्राथमिक फेरीत आज (१० डिसेंबर २०२२) रात्र संपली, पण उजाडलं कुठं? हे नाटक रत्नागिरीतील आश्रय सेवा संस्था सादर करणार आहे. पुरुषपात्रविरहित या नाटकात वैभवसंपन्न एका सच्छील गृहिणीची आणि पुत्रप्राप्तीनंतर तिला वेड लागल्याने संसाराची विस्कटलेली घडी बसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या बहिणीची ही कथा आहे.

समाजव्यवस्था बिघडवणाऱ्यांना घडविलेली अद्दल

एकसष्टाव्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर सुरू असलेल्या प्राथमिक फेरीत आज (९ डिसेंबर २०२२) मेलो, डोळो मारून गेलो हे नाटक कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघ सादर करणार आहे. लोकशाही व्यवस्थेचा गैरवापर करून समाजव्यवस्था बिघडविणाऱ्या समाजकंटकांना लोकशाही कशी अद्दल घडवते आणि लोकशाही पुर्स्थापित होऊन समाजव्यवस्थेचा कसा विजय होतो, हे या नाटकात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रकल्पांमुळे कोकणासमोर निर्माण झालेले प्रश्न

एकसष्टाव्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर सुरू असलेल्या प्राथमिक फेरीत आज (८ डिसेंबर २०२२) तुझा माझ्यावर भरोसा नाय काय? हे नाटक रत्नागिरीतील कुणबी कर्मचारी सेवा संघ सादर करणार आहे. प्रकल्पांमुळे कोकणासमोर निर्माण झालेले प्रश्न आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन या नाटकातून घडते.