रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२ ऑगस्ट) करोनाबाधित एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनामुळे मरण पावलेल्या जिल्ह्यातीलरुग्णांची संख्या आता ६१ झाली आहे. काल (१ ऑगस्ट) रात्री उशिरा सापडलेल्या ५५ नव्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांनंतर आज दिवसभरात आतापर्यंत नव्या रुग्णांची नोंद झालेली नाही. जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८८१ आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३८८ झाली आहे.