रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळपासून आज (१४ जून) सायंकाळपर्यंतच्या चोवीस तासांत करोनाचे १६ रुग्ण वाढले असून, १२ जण करोनामुक्त झाल्याने घरी गेले, तर उपचारांदरम्यान ६७ वर्षांच्या एकाचा मृत्यू झाला. सिंधुदुर्गात पाच नव्या रुग्णांची भर पडली असून, १६ जण करोनामुक्त झाल्याने घरी गेले आहेत.