बंडखोर की तारणहार?

शिवसेनेतील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी आपली घुसमट व्यक्त केली. पण मुख्यमंत्री असलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यांनी पक्षानिष्ठेपेक्षाही पदच प्रतिष्ठेचे केले. एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनीच शिवसेनेच्या तत्त्वांशीच अडीच वर्षांपूर्वी बंडखोरी केली. त्याची निस्तरणीच शिंदे आता करत आहेत.

कामातून गतिमान प्रशासनाचा संदेश पोहोचवू या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ‘लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. शासन प्रशासन गतिमान आहे, हा संदेश आपल्या कामातून देऊ या,’ असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (३० जून २०२२) केले. मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिव, तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या वेळी बैठकीस उपस्थित होते.

हाती केवळ एक शून्य!

महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर कवी विंदा करंदीकर यांची ‘तेच ते आणि तेच ते’ ही कविता नेहमीच आठवते. रोज नवे काही घडत असल्याचे भासत असले तरी त्यात फारसे काही वेगळे नसते. राजकारण्यांच्या खेळामध्ये पाच वर्षांनी एकदाच खेळल्यानंतर फेकून देण्याच्या लायकीची प्यादी म्हणूनच आपला उपयोग झाला आहे, हे आपल्याला समजत असते. खेळ त्यांचा होतो. आपला जीव जातो. ते पाहायला त्यांच्याकडे वेळ नसतो. अशा स्थितीत आपण काहीही करू शकत नाही. विंदा करंदीकरांची कविता आपण जगत असतो.

अन्याय झालेल्या चक्रीवादळग्रस्तांसाठी भाजपचा ‘द फिफ्थ पिलर’

रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या तौते चक्रीवादळात अनेकांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे त्यांना भरपाई मिळण्याची शक्यता नाही. हे लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेऊन ‘द फिफ्थ पिलर’ नावाची संकल्पना राबविली आहे. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर नुकसान झालेल्या कोणाही बागायतदाराला, मत्स्य व्यावसायिकांना तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही आपल्या नुकसानीविषयीची छायाचित्रे आणि व्हिडीओ सादर करता येऊ शकतील.

कोकणात रेल्वेगाड्या सोडण्यासाठी कोकण रेल्वे समन्वयक समितीचे आता फडणवीसांना साकडे

ठाणे : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गणपती गाड्या सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून त्याला यश आले नसल्याने कोकण रेल्वे समन्वयक समितीने आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.