बॅ. नाथ पै : ओजस्वी वक्तृत्वाचे तेजस्वी दर्शन!

बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता २५ सप्टेंबर २०२२ रोजी होत आहे. कोकणी जनतेने आपल्या ह्या लाडक्या नेत्याला अनेक बिरुदांच्या आभूषणांनी भूषविले. अगदी ‘लोकशाहीचा कैवारी’पासून ‘अनाथांचा नाथ’पर्यंत एक ना अनेक; पण त्या सर्वांत ‘वक्ता दशसहस्रेषु’ हे आभूषण नाथ पैंना जिरेटोपासारखे शोभून दिसायचे. बालपणी बॅ. नाथ पै यांची अनेक रसाळ भाषणे ऐकण्याची सुवर्णसंधी ज्यांना प्राप्त झाली, ते आचरा (मालवण) येथील ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी नाथ पै यांच्या अमोघ वक्तृत्वाबद्दल लिहिलेला सिंधुसाहित्यसरिता पुस्तकातील लेख येथे प्रसिद्ध करत आहोत. तसेच नाथ पै यांची दशावतारी नाटकातील कलाकारांसंदर्भातील एक हृद्य आठवण ही लेखाच्या शेवटी दिलेल्या व्हिडिओत सांगितलेली आहे.

आचऱ्यात साने गुरुजी पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम

आचरा : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि मालवणचे बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या संयुक्त विद्यमाने आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील बिडये विद्यामंदिर अर्थात केंद्रशाळा आचरे नं. १ येथे साने गुरुजी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्या वेळी रामचंद्र कुबल यांनी रामचंद्र देखणे यांच्या ‘जीवनयोगी साने गुरुजी’ या पुस्तकातील काही निवडक वेच्यांचे अभिवाचन केले.

मालवणी म्हणजे मने जोडणारी बोलीभाषा : सुरेश ठाकूर

मालवण : ‘मालवणी भाषा ही मने जोडणारी आणि भेदभाव संपवणारी गोड अशी बोलीभाषा आहे. कोकण किनारपट्टीवर अजूनही मराठीच्या चौदा बोलीभाषा आहेत; पण मालवणी भाषेच्या गोडव्याने आणि प्रेमळ आदरातिथ्य संस्काराने या भाषेचा झेंडा आज भाषानगरीत डौलाने फडकत आहे,’ असे मत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि लेखक सुरेश श्यामराव ठाकूर यांनी व्यक्त केले.

बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मालवणमध्ये राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

कोकणातील द्रष्टे नेते आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व बॅ. नाथ पै यांचे जन्मशताब्दी वर्ष २५ सप्टेंबर २०२१ पासून सुरू झाले आहे. त्यांच्या अनेक गुणांपैकी एक महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांचे अभ्यासू वक्तृत्व. म्हणूनच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने मालवणच्या बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे ‘बॅ. नाथ पै करंडक २०२२’ ही राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

सुरेश ठाकूर यांना अष्टावधानी गुरू पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहित्य, शिक्षण आदी क्षेत्रांतील ख्यातनाम व्यक्तिमत्त्व असलेल्या सुरेश ठाकूर यांना यंदाचा बापूभाई शिरोडकर स्मृती अष्टावधानी गुरू पुरस्कार जाहीर झाला आहे. बॅ. नाथ पै सेवांगण-कट्टा यांच्यातर्फे दर वर्षी हा पुरस्कार दिला जातो.

‘बालसन्मित्र’कार पा. ना. मिसाळ (सिंधुसाहित्यसरिता – ४)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा चौथा लेख… ‘बालसन्मित्र’कार पा. ना. मिसाळ यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे ऋतुजा केळकर यांनी…