सावरकर विद्यापीठाची गरज

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४० वी जयंती यावेळी मोठ्या अभूतपूर्व उत्साहात साजरी झाली. राज्य शासनाने प्रथमच त्यासाठी पुढाकार घेतला. अलीकडे सामाजिक समरसता आणि हिंदुत्व याबाबत अत्यंत टोकाची मते तयार झाली आहेत. ही टोके विचारांनीच बोथट करता येऊ शकतील. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी सावरकरांचा उल्लेख शतपैलू सावरकर असा केला होता. त्यांच्या या सर्व पैलूंचे संशोधन आणि अभ्यास तसेच प्रामुख्याने त्यांच्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे. त्यासाठी सावरकर विद्यापीठ स्थापन व्हायला हवे.

Continue reading

भीक मागून एसटीची स्वच्छता

सर्वसामान्य प्रवासी पुन्हा एकदा एसटीकडे वळावेत, या उद्देशाने दोन कोटी रुपयांची बक्षीस योजना एसटीने जाहीर केली आहे. पण ती करतानाही शासनाकडून किंवा तोट्यातील एसटी महामंडळाकडून कोणतीच आर्थिक तरतूद केली जाणार नाही. देणगीदार, उद्योजक, सामाजिक संस्थांकडून पैसे उपलब्ध करून घेऊन एसटी बस, उपाहारगृहे, बसस्थानके आणि परिसर स्वच्छ, सुंदर केला जावा, अशी ही योजना आहे. त्यातून निवड होणाऱ्या बसस्थानकांना बक्षिसे दिली जाणार आहेत. थोडक्यात म्हणजे कर्मचाऱ्यांनी देणगीदारांकडून पैसे उपलब्ध करून हे सौंदर्यीकरण करायचे आहे.

Continue reading

साहित्य चळवळीला चालना

कोकणात साहित्य चळवळ मोठ्या प्रमाणात रुजली आहे. अनेक साहित्यिक कोकणाने घडवले आहेत. विविध साहित्यिक संस्था, संघटना कोकणात पूर्वीपासून काम करत आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेपाठोपाठ मराठी साहित्य परिषदेच्याही अनेक शाखा कोकणात ठिकठिकाणी स्थापन झाल्या आहेत. त्यात आता अखिल भारतीय साहित्य परिषद या देशपातळीवरील साहित्य संस्थेची भर पडणार आहे. कोकणातील साहित्य चळवळीला देशपातळीवर स्थान देऊ शकणाऱ्या या संस्थेचे स्वागत करायला हवे.

Continue reading

कवी केशवसुतांच्या सकारात्मक विचारांचे जयंतीनिमित्ताने स्मरण

मालगुंड : मराठी साहित्यातील समाजपरिवर्तक साहित्यिक कवी केशवसुत यांच्या शतकोत्तर पंचावन्नाव्या जयंतीनिमित्ताने मालगुंड येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या सकारात्मक विचारांचे स्मरण करण्यात आले.

Continue reading