शुद्ध आयुर्वेदातील उपचारपद्धतींचा अभ्यासपूर्ण अवलंब करून रुग्णपीडा मुळापासून दूर होण्यासाठी नेमके मार्गदर्शन करणारे रत्नागिरीतील नामवंत वैद्य मंदार श्रीकांत भिडे यांचे दुर्दैवी निधन झाले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
शुद्ध आयुर्वेदातील उपचारपद्धतींचा अभ्यासपूर्ण अवलंब करून रुग्णपीडा मुळापासून दूर होण्यासाठी नेमके मार्गदर्शन करणारे रत्नागिरीतील नामवंत वैद्य मंदार श्रीकांत भिडे यांचे दुर्दैवी निधन झाले.
प्रशासनाने नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून, संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन बोटींसारख्या आवश्यक साहित्यासह पथक सज्ज ठेवण्यात आलं आहे.
खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीने भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली आहे.
कोकण स्वरप्रतिभा या कोकणस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या ऋग्वेद प्रवीण तेरेदेसाई याने प्रथम क्रमांक पटकावला. गोवा येथील स्वस्तिक कल्चरल असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी गोवा कला अकादमीच्या कृष्ण कक्षात उत्साहात पडली. ऋग्वेद हा रत्नागिरीच्या ‘स्वराभिषेक’ संगीत वर्गाचा शिष्य आहे.vv
मेडिकल, इंजिनीअरिंग, कम्प्युटर अशा रूढ क्षेत्रांमध्ये शिक्षण घेतले आणि आपण शहरी भागात असलो, तरच करिअरमध्ये उंच भरारी घेता येते, असा एक सर्वसाधारण समज आहे; मात्र रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील काटवली या छोट्याशा गावातील सुजित जाधवने या समजाला छेद देणारी उत्तुंग कामगिरी केली आहे.
‘कुपोषण कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद अग्रेसर असून, आगामी काळात विविध उपाययोजनांच्या माध्यमातून हे प्रमाण शून्यावर आणून राज्यामध्ये आदर्श निर्माण केला जाईल,’ असं राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितलं.