रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१२ एप्रिल) सलग चौथ्या दिवशी २०० हून अधिक करोनाबाधित आढळले. आज नवे २२७ रुग्ण आढळले, तर ७२ रुग्ण करोनामुक्त झाले. पाच जणांचा मृत्यू झाला.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१२ एप्रिल) सलग चौथ्या दिवशी २०० हून अधिक करोनाबाधित आढळले. आज नवे २२७ रुग्ण आढळले, तर ७२ रुग्ण करोनामुक्त झाले. पाच जणांचा मृत्यू झाला.
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (११ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार करोनाची बाधा झालेले नवे १७४ रुग्ण आढळले, तर ५५ जण करोनामुक्त झाले. आज दोघांच्या मृत्यूची नोंद झाली.
रत्नागिरी : गुढीपाडव्याला सुरू होणाऱ्या हिंदू नववर्षाची सुरुवात यावर्षी `कीर्तनसंध्याच्या `योद्धा भारत` आख्यानाने होणार आहे. सध्या करोनाचे युद्ध जगभरात सुरू असताना प्रत्यक्ष रणभूमीवर प्राणांची बाजी लावणाऱ्या शूर वीरांची कथा कीर्तनाच्या माध्यमातून घरबसल्या पाहण्याचा अनोखा योग रसिकांना साधणार आहे. रत्नागिरीच्या कीर्तनसंध्या परिवारातर्फे योद्धा भारत मालिकेत गेल्या वर्षी झालेली कीर्तने यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. या कीर्तनमालिकेत महाराष्ट्राचे सुपुत्र परम विशिष्ट सेवा पदक विजेते लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचे विचार ऐकण्याची संधीही रसिकांना मिळणार आहे.
मुंबई : करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्रात दहावी-बारावीच्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीला, तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होईल, असा अंदाज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. गीता जयंतीपासून झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी २०० हून अधिक करोनाबाधित आढळले आहेत. आज (११ एप्रिल) नवे २१४ रुग्ण आढळले, तर १६६ रुग्ण करोनामुक्त झाले. सात जणांचा मृत्यू झाला.