मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने १० जानेवारीपासून नवे निर्बंध लागू करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र फिरता येणार नाही. तसेच, रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही.
