वाढीव वीजबिलासंबंधी ३० जूनला रत्नागिरीत विशेष ग्राहक मेळावा

मार्च, एप्रिल व मे या लॉकडाउन कालावधीमध्ये ग्राहकांचे मीटर रीडिंग झाले नसल्यामुळे जून महिन्यात वीजबिले जास्त आली आहेत. वीजबिलांसंबंधी वीज ग्राहकांच्या असलेल्या तक्रारी पाहता उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी (३० जून) रत्नागिरी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात विशेष ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात एक जुलैपासून पुन्हा कडक लॉकडाउन

रत्नागिरी : रत्नागिरीतील करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन एक जुलैपासून रत्नागिरीत पुन्हा एकदा लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी, तसेच रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज (२८ जून) रोजी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

करोना लॉकडाऊनमध्ये ‘या’ कुटुंबाने विहीर खोदून पाणीप्रश्न सोडवला

राजापूर : करोनातील लॉकडाऊनच्या कालावधीचा सदुपयोग करीत राजापूरमधील बंगलवाडीतील जाधव कुटुंबीयांनी श्रमदानातून ५६ फूट खोल विहीर खोदून पाण्याचा प्रश्न मिटविला आहे. करोना आपत्तीकडे संकट म्हणून पाहिले जात असताना जाधव कुटुंबीयांनी त्या संकटाला संधी म्हणून पाहत स्वयंप्रेरणेतून महिनाभर राबून विहीर खोदली. त्यांनी कष्टपूर्वक पाणीटंचाईवर केलेली मात इतरांसाठी प्रेरणादायी म्हणावी लागेल.

केवळ पंधरा दिवसांनंतरच्या भविष्यासाठी

साप्ताहिक कोकण मीडियाच्या १० एप्रिल २०२०च्या अंकाचे संपादकीय…

धामापूरमधील अपंगांच्या २२ कुटुंबांना अवघ्या एका व्हॉट्सअॅप मेसेजवर मदत

व्हॉट्सअॅपवरच्या एका मेसेजवर धामापूर तर्फ संगमेश्वर (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील २२ अपंगांच्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत रत्नागिरीतून पाठविण्यात आली.

रत्नागिरीच्या ‘हेल्पिंग हँड्स’चा असाही मदतीचा हात

करोनाच्या प्रतिबंधाकरिता संचारबंदी सुरू असल्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याकरिता रत्नागिरीत हेल्पिंग हँड्स ही स्वयंसेवी संस्थांची साखळी प्रशासनाला मदत करत आहे; पण त्याही पलीकडे जाऊन याच साखळीच्या सदस्यांनी अत्यावश्यक सेवेतील एका सेवकाला दुचाकीचे पंक्चर काढून देऊन वेगळ्याच पद्धतीने मदतीचा हात दिला.