करोना गेलेला नाही, आपण धोक्याच्या वळणावर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : ‘महाराष्ट्राने करोनाची रुग्णसंख्यावाढ रोखली असली, तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर आहोत. मला पुन्हा कोणताही लॉकडाउन करायचा नाही; पण सर्वांनी स्वयंशिस्त पळून मास्क लावणे, हात धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे आहे,’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२२ नोव्हेंबर) केले. ते समाजमाध्यमावरून राज्यातील जनतेला उद्देशून बोलत होते.

फिनोलेक्स, ‘मुकुल माधव’मुळे १७०० कुटुंबांची दिवाळी होणार आनंदमय

मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या संयुक्त विद्यमाने समाजातील १७०० गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला जाणार आहे.

अनलॉक ४ : केंद्र सरकारच्या नव्या सूचना जारी

लॉकडाउन टप्प्याटप्प्याने उघडण्याच्या प्रक्रियेतील पुढचा टप्पा म्हणजेच ‘अनलॉक ४’च्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने आज (२९ ऑगस्ट) रात्री जाहीर केल्या. त्यानुसार, कंटेन्मेंट झोनच्या बाहेर पूर्वीपेक्षा अधिक कामकाज सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे; मात्र कंटेन्मेंट झोनमधील कडक निर्बंध सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरूच राहतील, असेही त्यात म्हटले आहे.

लॉकडाउनच्या काळात कोकणचा निसर्ग कुंचल्यातून उतरला कागदावर

पावसाळ्यात कोकणचा निसर्ग सर्वांनाच भुरळ पाडतो. पावसाच्या सरींनी सर्वत्र उगवणारे हिरवे अंकुर आणि शेतीच्या कामात मग्न असणारे शेतकरी कुटुंब असे सारे दृश्य नजरेचे पारणे फेडणारे असते. लॉकडाउनच्या काळात कोकणचा हा निसर्ग कलाशिक्षक विष्णू गोविंद परीट यांनी आपल्या कुंचल्यातून बहारदारपणे कागदावर उमटवलाय. परीट यांची चित्रे पाहून अक्षरशः थक्क व्हायला होते.

परीक्षांच्या घोळात नागरिकांची सत्त्वपरीक्षा दुर्लक्षित

साप्ताहिक कोकण मीडियाच्या १७ जुलैच्या अंकाचे संपादकीय

जिल्हावासीयांना कडक टाळेबंदी; बाहेरील नागरिकांना पायघड्या; आठ दिवसांत रत्नागिरीबाहेरून आले नऊ हजार नागरिक

रत्नागिरी : करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात एक जुलैपासून कडक लॉकडाउन लागू करण्यात आले. त्यात पुढेही वाढ करण्यात आली; मात्र या लॉकडाउनमध्ये जिल्ह्याबाहेरील नागरिकांनाही प्रवेश देण्यास बंदी घालण्याच्या स्वतःच्याच धोरणाचा प्रशासनाला विसर पडला आहे. या आठ दिवसांत जिल्ह्याबाहेरून तब्बल आठ हजार ९०२ नागरिक रत्नागिरी जिल्ह्यात आले आहेत.