कोकणातील पारंपरिक तारपा लोककलेचा वारसा जपणारे आदिवासी भिकल्या धिंडा यांना पद्मश्री

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज केंद्र सरकारकडून प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. त्यात महाराष्ट्रातून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना (मरणोत्तर) पद्मविभूषण, तीन जणांना पद्मभूषण आणि ११ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तारपावादनाची पारंपरिक लोककला जपणारे पालघरमधील आदिवासी भिकल्या धिंडा यांचा पद्मश्री पुरस्कारविजेत्यांमध्ये समावेश आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी धिंडा यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

स्पर्धापरीक्षांना सामोरे जाणे सोपे : सत्यवान रेडकर

पालघर : स्पर्धा परीक्षांविषयीचा न्यूनगंड बाजूला ठेवला, तर त्या परीक्षांना सामोरे जाणे सोपे असते, असे आश्वासक विचार परीक्षा मार्गदर्शक सत्यवान रेडकर यांनी व्यक्त केले.

उंचसखल गावाला समान दाबाने पाणीपुरवठा करणारी देशातील पहिली यंत्रणा

पालघर (नीता चौरे) : उंचसखल असलेल्या संपूर्ण गावाला सारख्याच दाबाने पाणीपुरवठा करण्याची देशातील पहिली यंत्रणा पालघर जिल्ह्यात साकारली आहे. कमी खर्चात उभारण्यात आलेली ही यंत्रणा उंचसखल भागात वसलेल्या कोकणातील अनेक गावांना उपयुक्त ठरणार आहे.

पालघरच्या किनारपट्टीवर कलहंसाचा मुक्त विहार

पालघर (नीता चौरे) : वातावरणातील वेगाने होणारे बदल आणि कमीजास्त प्रमाणात पडणारी थंडी अशी स्थिती असूनही पालघरच्या समुद्रकिनाऱ्यावर अनेक परदेशी पक्षी वास्तव्याला आले आहेत. त्यापैकी कलहंस नावाच्या पक्ष्याचा विहार पाहायला अनेक पक्षीप्रेमी आणि पर्यटक पालघरच्या किनारपट्टीवर येऊ लागले आहेत.

भात, नाचणीच्या कापणीनंतर स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती

पालघर : मिनी महाबळेश्वर हे नाव सत्यात उतरवण्यासाठी जव्हार-मोखाड्यातील शेतकरी पुढे सरसावले आहेत. पारंपरिक भातशेती आणि नाचणी शेतीला बगल देत किंवा भात आणि नाचणीच्या कापणीनंतर तेथील शेतकरी सध्या स्ट्रॉबेरीची लागवड करत आहेत. त्यातून शेतकऱ्यांना उत्तम उत्पन्न मिळत आहे.

काजू उद्योजकांना आयात काजूची भीती नको – डॉ. परशराम पाटील

लांजा : भारतीय काजूगराची चव, स्वाद पाहता भविष्यात भारतीय काजूची मागणी वाढतीच राहणार आहे. भारतीय उद्योजकांनी आयात होणाऱ्या काजूची भीती बाळगण्याचे कारण नाही, असे उद्गार भारत सरकारच्या कॉमर्स मंत्रालयाचे स्टार्ट अप इंडिया आणि आशियाई विकास बँकेचे सल्लागार डॉ. परशराम पाटील यांनी काढले.