जिल्हावासीयांना कडक टाळेबंदी; बाहेरील नागरिकांना पायघड्या; आठ दिवसांत रत्नागिरीबाहेरून आले नऊ हजार नागरिक

रत्नागिरी : करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात एक जुलैपासून कडक लॉकडाउन लागू करण्यात आले. त्यात पुढेही वाढ करण्यात आली; मात्र या लॉकडाउनमध्ये जिल्ह्याबाहेरील नागरिकांनाही प्रवेश देण्यास बंदी घालण्याच्या स्वतःच्याच धोरणाचा प्रशासनाला विसर पडला आहे. या आठ दिवसांत जिल्ह्याबाहेरून तब्बल आठ हजार ९०२ नागरिक रत्नागिरी जिल्ह्यात आले आहेत.

सिंधुदुर्गात करोनाचे पाच नवे रुग्ण; एकूण संख्या २५०

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी पाच व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५० झाली आहे.

जिल्ह्यात ८१४ करोनाबाधित; प्रादुर्भाव रोखण्यात रत्नागिरीची कामगिरी उत्तम असल्याचे गृहराज्यमंत्र्यांचे सर्टिफिकेट

रत्नागिरी : जिल्ह्यात काल (सात जुलै) सायंकाळपासून ३३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८१४वर पोहोचली असून, अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २६४ आहे. दरम्यान, आज (आठ जुलै) रत्नागिरी दौऱ्यावर असलेले गृह-राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी, रत्नागिरी जिल्ह्याची करोना प्रादुर्भाव रोखण्याची कामगिरी उत्तम असल्याचे सर्टिफिकेट दिले आहे.

राजापूर तालुक्यात वैद्यकीय अधिकारी आणि पत्नी करोनाबाधित

रत्नागिरी : काल (५ जुलै) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार राजापूरमधील एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीलाही करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत राजापूर शहरातील करोना रुग्णांची संख्या चारवर पोहोचली आहे. आता राजापूर तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ४२ वर गेली असून, राजापूर ग्रामीण रुग्णालयातील एकूण ३५ कर्मचाऱ्यांना आज क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात २४ तासांत करोनाचे नवे ४० रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. ६) सायंकाळपर्यंतच्या चोवीस तासांत करोनाचे नवे ४० रुग्ण आढळले असून, एकूण बाधितांची संख्या ७५० झाली आहे. रत्नागिरी शहरातील काही भागांसह मौजे कुर्धे हेही करोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. सिंधुदुर्गातील एकूण बाधितांची संख्या २४३ आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाच्या प्रत्येकी १३ रुग्णांची वाढ; राजापूर शहरात पहिला रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. ४) सायंकाळपर्यंतच्या चोवीस तासांत नव्या १३ रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ६९६ झाली आहे. राजापूर शहरात पहिला रुग्ण सापडला आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गेल्या २४ तासांत १३ रुग्णांची वाढ झाल्याने, तेथील रुग्णांची एकूण संख्या २४२ झाली आहे.