आचरे येथील केंद्रप्रमुख सुगंधा केदार गुरव सेवानिवृत्त; शिक्षकवर्गाकडून शुभेच्छा

आचरे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या सुगंधा केदार गुरव ३६ वर्षांहून अधिक वर्षांच्या सेवेनंतर ३१ मार्च २०२४ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्या निमित्ताने ‘केंद्र शाळा आचरे क्रमांक एक’ येथे शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षक वर्गाने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता.

पारंपरिक भरडधान्य महत्त्व आणि संवर्धनाविषयी प्रबोधन

कुडाळ : कळसूबाई मिलेट्स संस्थेच्या सौज्यन्याने पारंपरिक भरडधान्य महत्त्व व संवर्धनाच्या प्रबोधनाचा कार्यक्रम नेरूरपार येथील वसुंधरा विज्ञान केंद्रात पार पडला.

त्रिंबक वाचनालयातर्फे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

मालवण : त्रिंबक (ता. मालवण) येथील कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालयाने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.

साने गुरुजी कथामालेतर्फे आचरा येथे कथाकथन महोत्सव

मालवण : बँक ऑफ महाराष्ट्रची आचरे शाखा आणि साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेच्या संयुक्त विद्यमाने आचरे येथे मालवण तालुकास्तर कथाकथन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आमच्या नमशीचे भाऊमामा

आचरा (मालवण) येथील ज्येष्ठ लेखक आणि ‘कोमसाप-मालवण’चे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांचे मामा सदानंद काशिनाथ सामंत (नमस) यांना नुकतीच देवाज्ञा झाली. त्यांना आदरांजली वाहण्याच्या निमित्ताने सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला, आजोळच्या समृद्ध आठवणी जागवणारा हा लेख…

आचरे गावातली रामनवमी… ‘पुलं’, कुमार गंधर्वांच्या सहभागाने पुलकित झालेली..

आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री देव रामेश्वर मंदिरातील १९७५ सालचा रामनवमी उत्सव काही औरच होता. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे, सुनीताबाई, कुमार गंधर्व यांच्यासह महाराष्ट्रातील ख्यातकीर्त ७० कलावंतांच्या सहभागामुळे तो त्रिशतसांवत्सरिक उत्सव अविस्मरणीय झाला. त्या उत्सवाच्या आठवणींबद्दल आचऱ्यातील ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला हा लेख…