रत्नागिरी जिल्ह्याचा एकत्रित विचार करता, आज अखेरच्या दिवशी अध्यक्षपदांसाठी ३५, तर नगरसेवक पदांसाठी ३६४ असे एकूण तब्बल ३९९ अर्ज सादर झाले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी जिल्ह्याचा एकत्रित विचार करता, आज अखेरच्या दिवशी अध्यक्षपदांसाठी ३५, तर नगरसेवक पदांसाठी ३६४ असे एकूण तब्बल ३९९ अर्ज सादर झाले.
रत्नागिरी जिल्ह्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला असून, आज (१५ नोव्हेंबर) जिल्ह्यात एकूण ९३ जणांनी सदस्यपदाकरिता, तर पाच जणांनी अध्यक्षपदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केले.
रत्नागिरी : दिवाळी अंक ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी अंक पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणात तीन नव्या जेटी उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली असून, महाराष्ट्र सागरी प्राधिकरणाकडून सीआरझेडसंदर्भातील मंजुरीही मिळाली आहे.
नेहमीच येणारा पाऊस, त्यामुळे कोकणवासीयांची उडणारी दाणादाण, नेहमीच येणारा गणेशोत्सव, त्या काळात चाकरमान्यांना भोगावा लागणारा त्रास वर्षानुवर्षे तसाच आहे. वाहतुकीच्या सुविधा पुरविण्याच्या आश्वासनांच्या पावसात रस्ते मात्र वाहून गेले आहेत. यापुढेही ते तसेच वाहत राहतील. सण संपवून चाकरमानी परततील. खड्डे विसरतील. अगदी दरवर्षी येणाऱ्या गणपतीप्रमाणेच पुन्हा पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यांमधून कोकणात आपापल्या गावी येतील.
प्रथितयश लेखक जयवंत दळवी यांच्या स्मृतिशताब्दीचा नुकताच समारोप झाला. त्यांच्या आठवणी जपणारा कार्यक्रम त्यांचे मूळ गाव असलेल्या आरवली आणि परिसरात वर्षभर साजरा करण्यात आला. एखाद्या व्यक्तीची आठवण त्याच्या शंभराव्या वर्षात वर्षभर जपणारा असा एखादा कार्यक्रम अनोखाच आहे. सावंतवाडी आणि वेंगुर्ले या तालुक्यांमधील आरवलीच्या परिसरातील त्यांच्या चाहत्यांनी वर्षभर दळवींच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. साहित्य प्रेरणा कट्टा ही आभासी संस्था आणि शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे या शतकमहोत्सवी ग्रंथालयाने हा उपक्रम राबविला. साहित्य रसिक आणि हे साहित्य जतन करणारी, रसिकांना ते पुरविणारी ग्रंथालयासारखी संस्था विधायक हेतूने एकत्र आली की किती उत्तम आदर्श निर्माण होऊ शकतो, हेच या संस्थांनी दाखवून दिले आहे.