लष्करी कारवाईची वेळ येऊ देऊ नका!

संपूर्ण जग व्यापून टाकणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कसोटीचे प्रयत्न सुरू आहेत. भारतात, महाराष्ट्रात, जिल्ह्यात आणि अगदी ग्रामीण पातळीवरही प्रत्येक

खासगी डॉक्टर्सनी सेवा सुरूच ठेवण्याचे आदेश; प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधविक्रीस बंदी

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देशभरात लॉकडाउन आहे; मात्र या कालावधीत खासगी डॉक्टर्सनी आपले दवाखाने, रुग्णालये, नर्सिंग होम सुरू ठेवून नेहमीप्रमाणे रुग्णांची तपासणी सुरू ठेवावी, असे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच, प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधविक्रीस बंदी करण्यात आली आहे.

साठेबाजी, काळ्या बाजाराला प्रतिबंध; जीवनावश्यक वस्तूंच्या सहज उपलब्धतेकरिता व्यापाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

रत्नागिरी : सध्या राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि संचारबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तू व सेवा उपलब्ध करून देताना व्यापाऱ्यांकडून साठेबाजी, तसेच काळा बाजार झाल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यांच्यासाठी काही सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊन गर्दी करू नये, जीवनावश्यक वस्तू सुरळीतपणे उपलब्ध होणार आहेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

आता फक्त दुचाकींनाच आणि ठरलेल्या वेळेतच पेट्रोल मिळणार

राज्यात २३ मार्च २०२०पासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर, वाहनचालकांना पेट्रोल, डिझेलच्या पुरवठा करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात अखेर संचारबंदी लागू

करोना संसर्गाशी दोन हात करण्यासाठी राज्यात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता; मात्र तरीही लोक रस्त्यांवर येत असल्याने राज्यात संपूर्ण