सोशल मीडियाचा प्रभावी वापर; रत्नागिरीत अडकलेल्या तामिळी तरुणांची रत्नागिरी पोलिसांकडून भोजनव्यवस्था

रत्नागिरी : रत्नागिरीच्या एमआयडीसीत अडकून पडलेल्या दोनशे तामिळी तरुणांची भोजनाची व्यवस्था रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केली. तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना, तर त्यांच्याकडून जिल्हा पोलीस प्रमुखांना आलेल्या ट्विटर संदेशाची त्वरित दखल घेऊन मुंढे यांनी ही व्यवस्था केली.

आंबा पाठवा कोकण रेल्वेने!

रत्नागिरी : आंब्यासारख्या नाशिवंत मालाच्या वाहतुकीची व्यवस्था कोकण रेल्वेमार्फत केली जाणार असून, त्याकरिता संपर्क साधण्याचे आवाहन कोकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. करोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाउन असल्यामुळे शेतीमालाच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. हापूस आंब्यासारख्या हंगामी पिकावर कोकणाचे अर्थकारण अवलंबून असते. त्यामुळे या सेवेचा मोठा उपयोग होणार आहे.

लष्करी कारवाईची वेळ येऊ देऊ नका!

संपूर्ण जग व्यापून टाकणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कसोटीचे प्रयत्न सुरू आहेत. भारतात, महाराष्ट्रात, जिल्ह्यात आणि अगदी ग्रामीण पातळीवरही प्रत्येक

आठ मार्चनंतर पुण्या-मुंबईतून रत्नागिरीत आलेल्यांनी सक्तीने घरीच राहावे; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रत्नागिरी : मुंबई व पुणे शहरातून आठ मार्च २०२०नंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेल्या व्यक्तींनी राहत्या ठिकाणातून/घरातून बाहेर पडू नये, असे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर दंडनीय कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

साठेबाजी, काळ्या बाजाराला प्रतिबंध; जीवनावश्यक वस्तूंच्या सहज उपलब्धतेकरिता व्यापाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

रत्नागिरी : सध्या राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि संचारबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तू व सेवा उपलब्ध करून देताना व्यापाऱ्यांकडून साठेबाजी, तसेच काळा बाजार झाल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यांच्यासाठी काही सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊन गर्दी करू नये, जीवनावश्यक वस्तू सुरळीतपणे उपलब्ध होणार आहेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

का झाला 'आकाशवाणी रत्नागिरी'च्या कार्यक्रमांमध्ये बदल?

रत्नागिरी : आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून २४ मार्च २०२० रोजी नेहमीचे कार्यक्रम प्रसारित झाले नाहीत. करोना आजाराच्या प्रतिबंधासाठी गर्दी टाळण्याकरिता शक्य असेल तेथे शासकीय आणि खासगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा आणण्यात आली आहे. त्यामुळे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रातही मोजकेच कर्मचारी होते आणि स्थानिक कार्यक्रमांचे प्रसारण नेहमीप्रमाणे होऊ शकले नाही. त्यामुळे आकाशवाणीच्या नियमित श्रोत्यांना नेहमीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेता आला नाही. हीच स्थिती आणखी काही दिवस राहणार आहे.