रत्नागिरी जिल्ह्यातील पाचवी महिला करोनाबाधित, रुग्णसंख्या अकरा

रत्नागिरी : जिल्ह्यात आज आणखी एक करोनाबाधित महिला रुग्ण आढळला आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ही माहिती दिली. ती महिला ६५ वर्षांची असून मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी ती गेली होती. तेथून परतल्यानंतर तिला करोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचा धोका वाढला, करोनाबाधितांचे दशक, चौथ्या महिलेला करोना

रत्नागिरी : जिल्ह्यात आणखी दोघे करोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. एक रुग्ण मंडणगड येथील, तर दुसरा संगमेश्वर तालुक्यातील आहे. हे दोन रुग्ण आढळल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दहावर पोहोचली आहे, तर जिल्ह्यातील चौथ्या महिलेला करोना झाला आहे.

ऑन दी स्पॉट पिंट्यामुळे एका अपंगाला उज्ज्वल भविष्याची दिशा

रत्नागिरी : राजापूर शहरातील बंगलवाडी येथील टायर पंक्चर व्यावसायिक विवेक (पिंट्या) गुरव यांनी एका निराधार आणि अपंग व्यक्तीला माणुसकीचे दर्शन घडवून आधार देतानाच व्यवसाय सुरू करायला मदत करून स्वावलंबीही बनविले. ऑन दी स्पॉट टायर सेवा पुरविणाऱ्या आणि ऑन दी स्पॉट पिंट्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजापूरमधील विवेक ऊर्फ पिंट्या गुरव या कार्यकर्त्याचे कार्य अनेकांना प्रेरणादायी ठरावे.

रत्नागिरीत आढळले दोन नवे करोनाबाधित रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरीत काल रात्री (ता. १ मे) दोन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ही माहिती दिली.

उमेदच्या महिलांनी वाढवली रोजगार करू इच्छिणाऱ्यांची उमेद

रत्नागिरी : करोना प्रतिबंधक लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला असला तरी रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण जीवनोन्नती अभियानाशी संबंधित म्हणजेच उमेदच्या महिलांनी रोजगार करू इच्छिणाऱ्यांची उमेद वाढविण्याचे काम केले आहे. या महिलांनी विविध उद्योग करून एक कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळविले. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी ही माहिती दिली.

गावकऱ्यांनी पाठविलेल्या धान्याचे मुंबईच्या चाकरमान्यांना वितरण

रत्नागिरी : आजवर मुंबईकर चाकरमान्यांच्या मनिऑर्डरवर कोकणातील चुली पेटत होत्या. मात्र करोनाप्रतिबंधक लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या चाकरमान्यांच्या मुंबईतील चुली पेटण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. गावातच धान्य गोळा केले आणि ते चाकरमान्यांना मुंबईत घरपोच दिलेही.