ब्रिटनमध्ये असलेली शिवरायांची जगदंब तलवार आणि वाघनखे महाराष्ट्राला परत मिळणार; ब्रिटिश उपउच्चायुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद

छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटनमध्ये असलेली जगदंब तलवार व वाघनखे भारतात आणण्याच्या दृष्टीने ब्रिटिश उपउच्चायुक्त अ‍ॅलन गॅम्मेल यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या संदर्भात १५ एप्रिलला मुंबईत त्यांच्याशी झालेली चर्चा अत्यंत समाधानकारक झाली असून, त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील दृढ निश्चय पूर्ण होणार आहे, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

उषा परब यांच्या मालवणी साहित्यात विविधता : गोव्यातील परिसंवादातील मत

पणजी : मराठी साहित्यात क्वचितच दिसणारी मालवणी भाषा उषा परब यांच्या नाटकातून जाणवते. मालवणी भाषेत मोजकेच लेखक लेखन करतात. मालवणी भाषेतील साहित्य विपुल प्रमाणात प्रसिद्ध व्हायला हवे, असे प्रतिपादन नारायण महाले यांनी केले.

डॉ. अलका देव-मारुलकर यांची रत्नागिरीत शास्त्रीय संगीत कार्यशाळा

रत्नागिरी : विदुषी डॉ. अलका देव-मारुलकर यांची शास्त्रीय संगीत कार्यशाळा येथील स्वराभिषेक संस्थेतर्फे येत्या २ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांना दत्तात्रेय कृष्ण सांडू पुरस्कार

पणजी : गोमंतकीय साहित्यिक, पत्रकार आणि रत्नागिरीतील साप्ताहिक‘कोकण मीडिया’चे लेखक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांना मुंबईतील दत्तात्रेय कृष्ण सांडू साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्गात होणार नीट परीक्षेची केंद्रे

रत्नागिरी : नीट परीक्षेसाठी गोवा सेंटर निवडलेल्या सिंधुदुर्ग व रत्नागिरीमधील विद्यार्थ्यांना स्वॅब चाचणीशिवाय गोवा राज्यात प्रवेश करता यावा किंवा सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये नीट परीक्षा केंद्र मिळावे, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे केली होती. त्याला यश आले असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रे सुरू होणार आहेत. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची अडचण सुटणार आहे.

आठ जुलैला अखिल भारतीय कोकणी परिसंवादाचे ऑनलाइन आयोजन

पणजी : अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या वतीने आठ जुलै २०२० रोजी अखिल भारतीय कोकणी परिषदेचा ८२वा वर्धापनदिन ऑनलाइन पद्धतीने साजरा होणार आहे. प्रति वर्षी हा उत्सव पणजी येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या वर्षी करोना संकटामुळे हा कार्यक्रम मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणार असून, ऑनलाइन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.