खेडमधील दहिवलीत भूस्खलन; बेपत्ता दोघांना शोधण्याचे काम युद्धपातळीवर

खेड तालुक्यातल्या दहिवलीमध्ये डोंगराचा भाग खचून दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना काल रात्री (सहा जुलै) घडली असून, प्रशासन आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी मदतकार्य करत आहे.

कातळशिल्पांचे पूर्ण संरक्षण करूनच विकास प्रकल्पांचा विचार : आशिष शेलार

मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाचे महत्त्वाचे पुरावे असलेल्या कोकणातील कातळशिल्पांचे पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील या भागातील विकास प्रकल्पांचे नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी आज (७ जुलै) विधानसभेत दिली.

दापोलीत २४ तासांमध्ये ३०४ मिमी पाऊस; कशेडी घाटात कोसळली दरड

जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असून, उत्तरेकडच्या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली.

रत्नागिरीत पावसाचा कहर; सहा जुलैला शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या, सोमवारी, ६ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

रत्नागिरी विमानतळाचे काम ७५ टक्के पूर्ण; तीन महिन्यांत होणार पहिले उड्डाण

‘रत्नागिरीच्या विमानतळाचं काम ७५ टक्के पूर्ण झालं असून, येत्या सुमारे तीन महिन्यांमध्ये इथून पहिल्या विमानाचं उड्डाण होईल,’ अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली.

जगबुडी नदीची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा तीन मीटर अधिक

अति पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या नद्यांची पाणीपातळी सातत्याने वाढत असून, खेडमधल्या जगबुडी नदीचं पाणी शहराच्या मटण मार्केट परिसरात शिरण्यास सुरुवात झाली आहे.